शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे विक्रमगडमधील मोगरा कोमेजला; फुल बाजारपेठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:09 IST

यावर्षी हंगाम फुकट गेल्याने शेतकरी संकटात

राहुल वाडेकर 

विक्रमगड : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन मोसमात हा फटका बसल्याने शेतकºयाचे पार कंबरडे मोडले आहे. त्यात फुलशेती तर पूर्णपणे संपुष्टात आली असून विक्रमगड तालुक्यातील मोगरा उत्पादित करणाºया आदिवासी शेतकऱ्यांचे पार नुकसान झाले आहे.

खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी,उपराले, देहर्जा अशा अनेक गावांत मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात शेतकºयानी केली आहे. यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित व बेरोजगारीने पिसलेल्या येथील लोकांना उत्तम पर्याय निर्माण झाला. सोबत विक्रमगड-जव्हार तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, कावळा या ठिकाणी शेकडो आदिवासी शेतकºयांनी मोगरा लावला आहे.

मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते. ज्यात प्रतिकिलो ३०० ते ५०० इतका दर मिळत असतो. दादर व नाशिक या ठिकाणी मोगºयाला मागणी असून मोगºयामुळे आदिवासी लोकांच्या जीवनात सुगंध दरवळला होता. मोगरा दारात लावल्याने स्थलांतर थांबले असून वषार्नुवर्षे सुरू असलेल्या भटकंतीला पूर्णविराम लागला होता. यामुळे आदिवासी माणूस स्थिरावला होता.या मोगºयामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाब आणि सोनचाफ्याची देखील लागवड करण्यात आली आहे. त्यापासून देखील चांगले उत्पन्न हे शेतकरी घेत होते. त्यामुळे स्थलांतरित होणारी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिरावली होती. मात्र होळीपासून कोरोना व्हायरसचा फैलाव भारतात सुरू झाल्याने शेतीवर गदा आली.

लॉकडाऊनमुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई देखील अडकल्याने फुलशेतीवर कुºहाड कोसळली. मोगरा उत्पादक रातोरात बेरोजगार झाला असून ऐन मोसमात मोगºयाची मागणी ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत पावसाळा येईल. त्यांनतर मोगरा उत्पादन बंद होईल. त्यामुळे यंदाचा हंगाम बरबाद झाला असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे.तालुक्यात फुलशेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणारे शेतकरी आहेत. विविध गावांत मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू, कागडा फुलांचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यातून ही फुले दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर बाजारपेठेत जातात. होळीपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे तालुक्यातील फुलउत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. - शिवम मेहता, मोगरा उत्पादक

टॅग्स :Farmerशेतकरी