शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:41 IST

धुंदलवाडीच्या कातकरीपाड्यावरील नागरिकांची फरफट

बोर्डी : धुंदलवाडी गावच्या मुंबईपाड्यासह अन्य कातकरी पाड्यावरील आदिवासींकडे संसारोपयोगी किराणा साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही वेळच्या जेवणात केवळ भातावरच पोट भरण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान, शासनाने रेशन दुकानांवर अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी या गरजू लोकांकडून होत आहे.

दीड वर्षांपासून धुंदलवाडी हे गाव वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांसाठी ओळखले जात असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतात. या गावच्या कातकरी पाड्यावरील बहुतेक आदिवासींकडे स्वत:च्या मालकीची शेतजमिनी नसून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांना परगावातील बांधकाम आणि विटभट्टी व्यवसायासाठी स्थलांतरित व्हावे लागते. लॉकडाउन लागू झाल्याने त्यांना गावात परतावे लागले आहे. दीड महिन्यांपासून हाताला काम नसल्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह चालविणाºया या कुटुंबियांच्या गाठीला पैसा नाही. शासनाने रेशन दुकानांद्वारे त्यांना तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे.

सकाळी उठल्यापासून दोन कप चहासाठी चहा पावडर नसते. तर दुपार आणि रात्रीच्या जेवणात डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद यांची वानवा असल्याने असे पदार्थ खायला कुटुंबातील सदस्य धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ताटात कोणता पदार्थ वाढावा या समस्येने महिलांचे डोके चक्रावले आहे. एकीकडे कोरोनाशी लढताना शहरातील नागरिक दर तासाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करून या आजारापासून स्वत:चा बचाव करीत आहेत. तर दुसरीकडे येथील ग्रामस्थांना आंघोळीचा आणि कपड्यांचा साबण घ्यायला हाती पैसा नसल्याने शारीरिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लॉकडाउन काळात अन्य राज्यातील मजूर, नागरिक, प्रवासी यांच्यासाठी निवारा केंद्र उभारून तेथे त्यांच्या राहण्यासह नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था केली गेली. तर शहरी वस्तीनजीक राहणाºया नागरिकांना विविध संस्थांनी खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणेच महिना-दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य उपलब्ध करून दिले. मात्र या गावातील कातकरी पाड्यावर अद्याप कुणीच फिरकलेले नाही.केवळ शासनाने स्वस्त धान्य दुकानातून दिलेल्या तांदळवर संपूर्ण कुटुंबाची भिस्त अवलंबून आहे. परंतु हे किती दिवस चालेल, असा प्रश्न येथील कातकरीपाड्यावर राहणाºया दिनेश भसरा याने केला आहे. भूकंपाच्या भयाखाली वावरणाºया ग्रामस्थांना कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने रेशन दुकानांद्वारे येथील ग्रामस्थांसाठी तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे दात्यांकडून मदतीचा हात का मिळू नये, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस