शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:41 IST

धुंदलवाडीच्या कातकरीपाड्यावरील नागरिकांची फरफट

बोर्डी : धुंदलवाडी गावच्या मुंबईपाड्यासह अन्य कातकरी पाड्यावरील आदिवासींकडे संसारोपयोगी किराणा साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही वेळच्या जेवणात केवळ भातावरच पोट भरण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान, शासनाने रेशन दुकानांवर अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी या गरजू लोकांकडून होत आहे.

दीड वर्षांपासून धुंदलवाडी हे गाव वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांसाठी ओळखले जात असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतात. या गावच्या कातकरी पाड्यावरील बहुतेक आदिवासींकडे स्वत:च्या मालकीची शेतजमिनी नसून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांना परगावातील बांधकाम आणि विटभट्टी व्यवसायासाठी स्थलांतरित व्हावे लागते. लॉकडाउन लागू झाल्याने त्यांना गावात परतावे लागले आहे. दीड महिन्यांपासून हाताला काम नसल्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह चालविणाºया या कुटुंबियांच्या गाठीला पैसा नाही. शासनाने रेशन दुकानांद्वारे त्यांना तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे.

सकाळी उठल्यापासून दोन कप चहासाठी चहा पावडर नसते. तर दुपार आणि रात्रीच्या जेवणात डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद यांची वानवा असल्याने असे पदार्थ खायला कुटुंबातील सदस्य धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ताटात कोणता पदार्थ वाढावा या समस्येने महिलांचे डोके चक्रावले आहे. एकीकडे कोरोनाशी लढताना शहरातील नागरिक दर तासाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करून या आजारापासून स्वत:चा बचाव करीत आहेत. तर दुसरीकडे येथील ग्रामस्थांना आंघोळीचा आणि कपड्यांचा साबण घ्यायला हाती पैसा नसल्याने शारीरिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लॉकडाउन काळात अन्य राज्यातील मजूर, नागरिक, प्रवासी यांच्यासाठी निवारा केंद्र उभारून तेथे त्यांच्या राहण्यासह नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था केली गेली. तर शहरी वस्तीनजीक राहणाºया नागरिकांना विविध संस्थांनी खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणेच महिना-दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य उपलब्ध करून दिले. मात्र या गावातील कातकरी पाड्यावर अद्याप कुणीच फिरकलेले नाही.केवळ शासनाने स्वस्त धान्य दुकानातून दिलेल्या तांदळवर संपूर्ण कुटुंबाची भिस्त अवलंबून आहे. परंतु हे किती दिवस चालेल, असा प्रश्न येथील कातकरीपाड्यावर राहणाºया दिनेश भसरा याने केला आहे. भूकंपाच्या भयाखाली वावरणाºया ग्रामस्थांना कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने रेशन दुकानांद्वारे येथील ग्रामस्थांसाठी तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे दात्यांकडून मदतीचा हात का मिळू नये, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस