शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : परदेशातून आलेल्या चौघांना कोरोनाच्या संशयामुळे अर्ध्या वाटेतच उतरविले, नंतर रेल्वेची दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 01:30 IST

गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले.

- हितेन नाईकपालघर : जर्मनी (फ्रँकफर्ट) येथून आल्याचे कारण देत बांद्रा येथून गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. या चारही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सत्य चौकशीअंती समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. शेवटी हजारो रुपयांचा भूर्दंड सहन करीत त्यांना खाजगी वाहनाने आपल्या घरची वाट धरावी लागली. तसेच तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस अ‍ॅप टाकण्यात आले असून त्यांनी पुढील १४ दिवस आपले घर सोडून अन्य ठिकाणी जाण्याबाबत लक्ष ठेवले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.देशभरातून ३०० विद्यार्थी जर्मनीच्या इसेन्ट येथील विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. त्यातील बडोदा, सुरत, भावनगर येथील चार विद्यार्थी हे एअर इंडियाच्या विमानाने बुधवारी (एआयओ १२४) विमानतळावर उतरले. दोन तास इमिग्रेशन तर दीड तास वैद्यकीय कक्षात तपासणी केल्यानंतर त्यांच्या हातावर ‘होम कोरन्टईन’ असा शिक्का मारण्यात आला. प्रवासात मास्क आणि सॅनिटाईझर वापरण्याच्या सूचनेनुसार चौघांनीही सर्व साहित्य खरेदी करीत गरीबरथ सुपर फास्ट एक्सप्रेस पकडली. ही गाडी बोरिवली येथे आली असताना नव्याने चढलेल्या काही नजीकच्या प्रवाशांनी तुम्ही कुठून आलात, अशी विचारणा केली. जर्मनीवरून आल्याचे सांगितल्यानंतर परदेशातून इथे कोरोना घेऊन आलेत का? असे त्यांना सुनावून त्यांची तक्र ार बोगीतील तिकीट तपासनीसाकडे केली. तिकीट तपासनिसाने चौघांनाही एका वेगळ्या बोगीत जायला सांगितल्याचे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले. जर्मनीतून आलेले चार प्रवासी कोरोना संशयित असल्याची तक्रार रेल्वेच्या टिष्ट्वटरद्वारे करण्यात आल्यानंतर तिकीट तपासनिसांनी ट्रेनला थांबा नसतानाही चौघांना पालघर स्थानकात उतरविले. आम्हाला १४ दिवस घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने आम्ही सर्व प्रकारच्या दक्षता घेऊन आपल्या घरी जात असल्याचे सांगूनही आम्हाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत जबरदस्तीने उतरविण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.या विद्यार्थ्यांना पालघर स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांची पूर्ण चौकशी केली. हातावर असलेल्या होम कोरोन्टईनच्या शिक्क्यामुळे रेल्वेने प्रवास न करता खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. यामुळे त्यांनी पालघरमधून भाड्याने खाजगी वाहन घेत ते घरी रवाना झाले.पालघर रेल्वे प्रबंधक मिलिंद कीर्तिकर, स्टेशन मास्तर आणि आरोग्य यंत्रणेचे अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडे दिलगिरीही व्यक्त केली. परंतु याबाबत तिकीट तपासनिकाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे का? अशी विचारणा पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना विचारले असता त्यांनी कारवाई होणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे