शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

Coronavirus: पालघर, वसई-विरारमध्ये बाधितांची संख्या ४२४५; ग्रामीण भागातील प्रादुर्भावानेही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:31 IST

याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे.

पालघर/विरार : पालघर जिल्ह्यात ४ हजार २४५ कोरोनाबाधित तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला असून ही साखळी वाढतच चालली आहे. त्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये रविवार-पर्यंतच्या आकडेवारीनुसार पालघर तालुक्यामध्ये २९०, डहाणू ९३, तलासरी १३, जव्हार १०१, मोखाडा २२, वसई ग्रामीण १६५, विक्रमगड ९९, वाडा २१५, तर वसई-विरारमध्ये सर्वाधिक ३५५० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने तर नागरिकांच्या मनात भीतीची दाट छाया पसरलेली आहे. तीन हजारचा टप्पा पार करून आता वेगाने येथे बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत साडेतीनशे, अडीचशेच्या संख्येने येथे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात या जीवघेण्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरपेक्षा जास्त झालेली आहे, मात्र त्याच वेळी आनंदाची बाब म्हणजे ५० टक्केपेक्षा जास्त रुग्णांनी या जीवघेण्या आजावर मातही केलेली आहे.

याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे. वाडासारख्या भागातीलही दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच वेळी वसई ग्रामीण भागामध्ये जवळपास दीडशे कोरोनाधित आढळून आले आहेत. विक्रमगडसारख्या भागातही बाधितांचा आकडा शतकानजीक पोहोचला आहे.मच्छीमारांची कामे खोळंबली१ जून ते ३१ जुलै असा पावसाळी मासेमारी बंद कालावधी असल्याने सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत. या कालावधीत मच्छीमार इंजीन दुरुस्ती, जाळी दुरुस्ती, बोटीची डागडुजी, रंगरंगोटी अशा कामांत व्यग्र असतो.२७ जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने मच्छीमारांची सर्व कामे खोळंबली आहेत. या बंदचा कुठलाही कालावधी घोषित करण्यात न आल्याने रुग्णसंख्येची साखळी वाढल्यास तो १४ किंवा २८ दिवसांपर्यंत वाढू शकतो.३१ जुलैनंतर मासेमारीस सुरुवात होणार असल्याने उर्वरित एक महिन्यात मासेमारीची सर्व तयारी करण्याचे शिवधनुष्यपेलावे लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस