शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

Coronavirus: पालघर, वसई-विरारमध्ये बाधितांची संख्या ४२४५; ग्रामीण भागातील प्रादुर्भावानेही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:31 IST

याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे.

पालघर/विरार : पालघर जिल्ह्यात ४ हजार २४५ कोरोनाबाधित तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला असून ही साखळी वाढतच चालली आहे. त्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये रविवार-पर्यंतच्या आकडेवारीनुसार पालघर तालुक्यामध्ये २९०, डहाणू ९३, तलासरी १३, जव्हार १०१, मोखाडा २२, वसई ग्रामीण १६५, विक्रमगड ९९, वाडा २१५, तर वसई-विरारमध्ये सर्वाधिक ३५५० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने तर नागरिकांच्या मनात भीतीची दाट छाया पसरलेली आहे. तीन हजारचा टप्पा पार करून आता वेगाने येथे बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत साडेतीनशे, अडीचशेच्या संख्येने येथे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात या जीवघेण्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही शंभरपेक्षा जास्त झालेली आहे, मात्र त्याच वेळी आनंदाची बाब म्हणजे ५० टक्केपेक्षा जास्त रुग्णांनी या जीवघेण्या आजावर मातही केलेली आहे.

याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. एकट्या पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी अडीचशेचा टप्पा पार केला आहे. वाडासारख्या भागातीलही दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच वेळी वसई ग्रामीण भागामध्ये जवळपास दीडशे कोरोनाधित आढळून आले आहेत. विक्रमगडसारख्या भागातही बाधितांचा आकडा शतकानजीक पोहोचला आहे.मच्छीमारांची कामे खोळंबली१ जून ते ३१ जुलै असा पावसाळी मासेमारी बंद कालावधी असल्याने सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत. या कालावधीत मच्छीमार इंजीन दुरुस्ती, जाळी दुरुस्ती, बोटीची डागडुजी, रंगरंगोटी अशा कामांत व्यग्र असतो.२७ जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने मच्छीमारांची सर्व कामे खोळंबली आहेत. या बंदचा कुठलाही कालावधी घोषित करण्यात न आल्याने रुग्णसंख्येची साखळी वाढल्यास तो १४ किंवा २८ दिवसांपर्यंत वाढू शकतो.३१ जुलैनंतर मासेमारीस सुरुवात होणार असल्याने उर्वरित एक महिन्यात मासेमारीची सर्व तयारी करण्याचे शिवधनुष्यपेलावे लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस