शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत ४०४ जणांचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 23:59 IST

नागरिकांच्या बेफिकिरीचा परिणाम

हितेन नाईक/सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्कपालघर / पारोळ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असतानाच आता रुग्णांचे मृत्यूही होत असल्याने कोरोना हा अनेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, सरकारने संचारबंदीचे कडक निर्बंध लागू केलेले असतानाही काही बेफिकीर नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे वगैरे बाबी आवश्यक आहेत, मात्र बेफिकीर नागरिकांकडून त्याचाच अवलंब केला जात नसल्याचे सातत्याने आढळून आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.  विशेषतः पालघर तालुक्यामध्ये जास्त रुग्ण आढळले असून या तालुक्यात  १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर डहाणू तालुक्यामध्ये ४७ जणांचा प्राण गेला आहे. जव्हार तालुक्यामध्ये २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. वाडा तालुक्यामध्ये ६० जण मृत्यू पावले आहेत. वसईच्या ग्रामीण परिसरात ५० जण दगावले आहेत. मोखाडा तालुक्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रमगड तालुक्यात १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तलासरी तालुक्यात ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके आदिवासीबहुल असून या भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने आणि कोविड रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर करणे आणि सामाजिक अंतर पाळणे ही त्रिसूत्री अवलंबली पाहिजे. - अरविंद पाटील, सरपंच, सातपाटी

वसई तालुक्यात शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गावागावात मृत्यूही होत असल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.     - नीलेश दिनकर पाटील, अध्यक्ष, जनसेवा फाऊंडेशन