शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्वयंपाकघरातून तांबा-पितळेची भांडी झाली कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:48 IST

ग्रामीण महिलांच्या जीवनशैलीत बदल 

- राहुल वाडेकर विक्रमगड : अनेक वर्षापासून घरोघरी जेवण शिजविण्यासाठी वापरली जाणारी पिढीजात तांबा-पितळेची भांडी सध्याच्या धावपळीच्या व आधुनिक युगामध्ये ग्रामीण महिलांच्या स्वयंपाकघरातून कालबाह्य झाल्याचे चित्र दिसत आहे. या भाड्यांचा आरोग्यदायी उपयोग माहिती असतानाही बदलत्या जीवनशैलीत झटपट अन्न तयार करण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या स्टेनलेस स्टील, फायबर किंवा इतर धातूंच्या भांड्यांना जवळ करीत तांबा, पितळेच्या भांड्यांना कालबाह्य केले आहे.

आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्यांची भांडी सर्रास वापली जात होती. चुलीत लाकडे जाळून अन्न तयार करताना या भाड्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते, परंतु आताच्या आधुनिक युगामध्ये चुलीऐवजी स्टोव्ह, गॅस, शेगडी अशा विविध व झटपट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वजनाने हलक्या धातूंच्या भांड्यांना महत्त्व आले.

आता सर्रासपणे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या धातूंपैकी काही धातूंच्या भाड्यांत अन्न शिजविणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याकडे अनेकदा लक्ष वेधले गेले असले तरी या धातूच्या भांड्यांचा वापर कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. या भाड्यांवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही असेही म्हटले आहे. तर अनेक जण सध्या जुनी परंपरागत पिढीजात पितळी व तांबेची भांडी कवडीमोल भावाने सर्रासपणे मोडीत काढीत आहेत आणि त्याऐवजी दुसºया धातूंची भांडी घेतली जात आहेत. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा याचा वापर देवपूजेत अधिक होत असे. मात्र तेही साहित्य सध्या मोडीत निघायला लागले आहे.

स्टेनलेस स्टील किंवा थेट चांदीच्या वस्तू देवघरात दिसू लागल्या आहेत. ज्याच्या घरात तांब्या-पितळेची भांडी अधिक तशी त्यांची श्रीमंतीही लक्षात यायची. ज्यांनी ही भांडी मोडीत काढली नाहीत त्यांनी ती स्वयंपाकघरातून केवळ शोभेपुरती ठेवली आहेत. तांब्या पितळ्याच्या भाड्यांचा लग्नात आहेर करण्याची पद्धत बंदच झाली आहे. रुकवतातही स्टेनलेस स्टीलने घुसखोरी केली आहे. तांबा आणि पितळेची भांडी भविष्यात भावी पिढीसाठी ऐतिहासिक ठेव्याप्रमाणे वाटली तर नवल वाटणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र