शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:13 IST

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यामधील भ्रष्टाचार : सुप्रीमनंतर शिवशाहीनेही केले उखळ पांढरे

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात पडलेले खड्डे भरण्याच्या कामात ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचा गैरव्यवहार केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी भिवंडी चे आमदार रु पेश म्हात्रे यांनी राज्याच्या मुख्य अभियंत्यांकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे.

या तक्रारीत ते म्हणतात की, वाडा व भिवंडी या दोन तालुक्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून तो सुिप्रम कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मोठे खड्डे आणि खचलेल्या साईट पट्ट्यांमुळे गत काही महिन्यात येथे अनेक अपघात घडलेले आहेत. या संदर्भात शासन स्तरावर अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी लेखी निवेदने, तक्र ारी आणि उपोषण करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.साबाच्या अधिकाºयांनी संगनमताने सुप्रिम कंपनीला संरक्षण देण्याचे काम केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विभागाला खड्डे भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात सुद्धा आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर बांधकाम विभागाकडून त्या संबधीची ई निविदा काढण्यात आली. त्यानुसार शिवशाही कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने खड्डे भरण्याचे काम हाती घेतले.अंदाजपत्रकानुसार खड्डे भरण्याचे काम होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने हे फक्त कागदावरच केल्याचे दिसत आहे.त्यासंबधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती घेतली असता. खड्डे भरण्याची कामे न करता सुमारे दोन कोटी रु पयांची बिले अदा करण्यात आली आहेत. खोटी बिले ठेकेदाराने अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच काढले असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला असून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या खड्डे भरण्याच्या कामाच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराला काम न करताच बिले अदा करणाºया अधिकाºयांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे. त्याची मुख्य अभियंत्यांनी दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशीचे आदेशमुख्य अभियंत्यांनी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार यांनी लोकमतला दिली. भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी दोन कोटी २० लाख रु पयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी जूनपर्यंत भरलेल्या खड्ड्यांचे सुमारे ४० ते ४५ लाखांचे बील ठेकेदारास आदा केले असून उर्वरित रक्कम शिल्लक आहे अरविंद कापडणीस सायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा यांनी दिली आहे.वाडा भिवंडी रस्त्यावरील अपघातांची संख्या पाहता. हे प्रकरण खूपच गंभिर आहे. त्यातच ठेकेदार शिवशाही कन्ट्रक्शन यांनी खड्डे भरल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधीचे बिल काढले आहे. त्याची चौकशी व्हावी!- रुपेश म्हात्रे, आमदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा