शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

काँग्रेस-भाजपा-काँग्रेस! प्रफुल्ल पाटलांना जिल्हाध्यक्षपद दिल्याने 300 हून अधिक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:39 IST

जिल्हा परिषद पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती वाताहत झाल्यानंतर तात्काळ काँग्रेस श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांच्या जागी प्रफुल्ल पाटील ह्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कडे पाठवून दिले.

पालघर: लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अडचणी काळात काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रफुल्ल पाटील यांना पुन्हा पक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष पद दिल्याच्या पार्श्वभूमीवर 300 च्यावर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त होईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.

 जिल्हा परिषद पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती वाताहत झाल्यानंतर तात्काळ काँग्रेस श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांच्या जागी प्रफुल्ल पाटील ह्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कडे पाठवून दिले. मात्र, ह्याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आली नसून काँग्रेसमध्ये नसलेल्या आणि काँग्रेस च्या पडत्या काळात काँग्रेस सोडून गेलेल्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष पद देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्याध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाची ध्येय धोरणे व घटने नुसार जिल्हाचे नेते, पदाधिकारी, प्रमुख नेते ह्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असताना आपल्याच पक्षातील काही विघ्न संतोषी लोकांच्या सांगण्यावरून निवड केल्याचे सांगून ही निवड प्रक्रियाच काँग्रेस घटनेच्या विरोधात असल्याचे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख ह्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात प्रवेश द्या मात्र जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊ नका, अशी मागणी आम्ही काँग्रेस अध्यक्षांकडे केल्याचे माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांनी सांगितले.

विक्रमगड मधील एका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीत भाजप ला मदत व्हावी हा ह्या निवडी मागचा डाव असल्याचे ही पाटील ह्यांनी सांगितले ह्या निवडी विरोधात दिवाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, सचिव मनोज पाटील, खजिनदार चंद्रकांत पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ मेमन, रोशन पाटील, मनोहर दांडेकर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या निवडीचा पुनर्विचार न केल्यास 300 पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या राजीनाम्याने पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त होईल, असा दावा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेस