शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

कुपोषणमुक्त जिल्ह्याची संकल्पना राबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:22 IST

पालघर जिल्ह्यात आठ तालुके मिळून १३ प्रकल्प असून १०३ बीट आहेत. प्रत्येक बीटनिहाय सरासरी २५ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून एकूण ३ हजार १८३ अंगणवाडी केंद्रे आहेत.

पालघर : जिल्ह्यातील कुपोषणाची मागील अनेक वर्षांपासूनची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने ‘कुपोषण मुक्त जिल्हा’ अशी संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अंमलात आणण्याचा संकल्प ठेवला आहे. त्यांनी आपल्या बालविकास प्रकल्प अधिकारी व कार्यरत पर्यवेक्षिका यांच्या बैठकीतून कामाचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.पालघर जिल्ह्यात आठ तालुके मिळून १३ प्रकल्प असून १०३ बीट आहेत. प्रत्येक बीटनिहाय सरासरी २५ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून एकूण ३ हजार १८३ अंगणवाडी केंद्रे आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प पालघरमध्ये सॅम व मॅम मुक्त बीटची संख्या ३, मनोर ४, डहाणू १, वसई १ असे बीट आहेत. परंतु सॅम नसणारी व मॅम श्रेणीमध्ये असणारी बीटची संख्या ३४ इतकी आहे. ५ बालके सॅम श्रेणीमध्ये असणारी बीट ४४ इतकी आहेत. जिल्हा कुपोषणमुक्त करायचा असल्यास सॅम आणि मॅममुक्त अंगणवाडी केंद्र व अंगणवाडी प्रभाग राबविण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.आयसीडीएस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रितरीत्या समुपदेशन व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कामकाज केल्यास कुपोषणमुक्त होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी दर तीन महिन्यांनी सातत्य टिकवून ठेवणाऱ्या पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्तींना  प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून काम करताना अनेक कुटुंबे स्थलांतरित होतात. त्यांना तेथील जवळच्या अंगणवाडीमध्ये बालकांना सुविधा देऊन आरोग्य शिबिरे लावण्याच्या सालीमठ यांनी सूचना दिल्या. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेअंतर्गत ज्या पालकांनी एक वा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास त्यांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार व पंचवीस हजार देण्यात यावेत असाही निर्णय घेतला.  अंगणवाडीनिहाय पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरता जलजीवन मिशनअंतर्गत सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.  बाल संगोपन योजनेबाबत जास्तीत जास्त प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केल्यास एक पालक असणाऱ्र्या किंवा पालक नसणाऱ्या बालकांना त्याचा फायदा घेता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.  विविध विभागांशी समन्वय साधून कुपोषण मुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीवेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार उपस्थित होते.