शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पालघर जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी तणावाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:45 IST

नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद

पालघर/पारोळ : देशाची ढासळती आर्थिक स्थिती तसेच नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद लाभत असताना पालघर शहारामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून बंदच्या कार्यात अडथळे आणले. यामुळे जिल्ह्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. बंद दरम्यान अडथळे आणणाऱ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील पालघर, वसई तालुक्यातील शहरी भाग वगळता अन्य सहा तालुक्यांत बंदचा विशेष प्रभाव जाणवला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीने राज्यभर बंदची घोषणा केल्यानंतर पालघर शहरात बंद पाळण्यात येणार असल्याने शहरातील विविध व्यापारी संघटनांनी आपली दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवीत आम्ही बंदला समर्थन देणार नसल्याने आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळण्याची लेखी मागणी पालघर पोलीस ठाण्यात केली होती. त्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी सकाळी वंचितच्या वतीने शहरातील दुकाने बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याने सकाळी २ ते ३ तास शहरातील दुकाने, रिक्षा बंद होत्या.याच दरम्यान नागरिकत्व कायद्याचे समर्थक असलेल्या भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढून जय श्रीरामच्या घोषणा देत बंद असलेली दुकाने उघडण्याचे आवाहन केल्याचे दिसून आले. या वेळी जय मोदीच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते की काय असा प्रसंग निर्माण झाला होता. मात्र पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कुठलेही गालबोट न लागता ११-१२ नंतर शहरातील सर्व दुकाने उघडली गेली. वसई तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय गट एकत्र येऊन आंदोलनात उतरले होते, त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी सामाजिक व धार्मिक संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सामील झाले होते. व्यापारी वर्गानी बंदला चांगला प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रसंगी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.जय श्रीरामच्या घोषणाजिल्ह्यात शांततेने बंद करण्यात यावा यासाठी वंचितच्या वतीने पोलिसांसह विविध संघटनांच्या युनियन, शिक्षण समिती यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु पालघर जिल्हा व तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून हातात तिरंगा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. तसेच दुकानदारांना ‘डरने की कोई बात नही’ असे आवाहन केले.

टॅग्स :palgharपालघरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक