शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
2
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
3
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
4
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
5
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
6
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
7
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
8
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
9
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
10
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
11
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
12
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
13
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
14
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
15
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
16
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
17
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
18
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
19
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:58 IST

वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले

वाडा : वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदाराला दिले आहेत. ही योजना रखडल्याने नागरिकांना मुबलक तसेच शुद्ध पाणी मिळत नाही. या रखडलेल्या पाणी योजनेवर चर्चा करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एल. लंबाते यांनी गुरुवारी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांची एक बैठक बोलावली होती.या रखडलेल्या योजनेवर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांनी जिल्हा परिषदेत अनेकदा आवाज उठवला. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एल.लंबाते यांनी त्याची दखल घेऊन यावर चर्चा करण्यासाठी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार यांची एक बैठक बोलावून पाणी योजनेचे काम का रखडले याची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना तीन वर्ष रखडल्याचा आरोप करून पाणी योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले.त्यानंतर कार्यकारी अभियंता लंबाते यांनी पाणी योजना तत्काळ होणे महत्त्वाचे असून, यापुढे होणारी कामे ही चाचणी करूनच शासनाच्या नियमाप्रमाणे करणे ठेकेदाराला बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले. काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही लंबाते यांनी संबंधित ठेकेदार संदेश बुटाला यांना दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके, माजी उपसभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.एस.कुलकर्णी, शाखा अभियंता निलेश पाटील आदी उपस्थित होते.>तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कामगारांनी कुडूस हे केंद्र मानून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. आजमितीस या गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. पूर्वी असलेली नळ पाणी पुरवठा ही गावाला पाणी पुरवण्यास असमर्थ ठरल्याने २०१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कुडूससाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर विहीर, पाण्याच्या टाक्या असे काम करण्यात आले. मात्र उर्वरित कामे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत झाली नाहीत. तीन वर्षांपासून या योजनेचे काम रखडले ते आतापर्यंत. मुख्य आणि अंतर्गत पाईपलाईन, जलशुध्दीकरण यंत्र अशी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत.