शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:58 IST

वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले

वाडा : वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदाराला दिले आहेत. ही योजना रखडल्याने नागरिकांना मुबलक तसेच शुद्ध पाणी मिळत नाही. या रखडलेल्या पाणी योजनेवर चर्चा करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एल. लंबाते यांनी गुरुवारी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांची एक बैठक बोलावली होती.या रखडलेल्या योजनेवर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांनी जिल्हा परिषदेत अनेकदा आवाज उठवला. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एल.लंबाते यांनी त्याची दखल घेऊन यावर चर्चा करण्यासाठी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार यांची एक बैठक बोलावून पाणी योजनेचे काम का रखडले याची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना तीन वर्ष रखडल्याचा आरोप करून पाणी योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले.त्यानंतर कार्यकारी अभियंता लंबाते यांनी पाणी योजना तत्काळ होणे महत्त्वाचे असून, यापुढे होणारी कामे ही चाचणी करूनच शासनाच्या नियमाप्रमाणे करणे ठेकेदाराला बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले. काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही लंबाते यांनी संबंधित ठेकेदार संदेश बुटाला यांना दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके, माजी उपसभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.एस.कुलकर्णी, शाखा अभियंता निलेश पाटील आदी उपस्थित होते.>तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कामगारांनी कुडूस हे केंद्र मानून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. आजमितीस या गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. पूर्वी असलेली नळ पाणी पुरवठा ही गावाला पाणी पुरवण्यास असमर्थ ठरल्याने २०१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कुडूससाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर विहीर, पाण्याच्या टाक्या असे काम करण्यात आले. मात्र उर्वरित कामे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत झाली नाहीत. तीन वर्षांपासून या योजनेचे काम रखडले ते आतापर्यंत. मुख्य आणि अंतर्गत पाईपलाईन, जलशुध्दीकरण यंत्र अशी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत.