शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 23:46 IST

जिल्हा वार्षिक नियोजनाचा ४०५ कोटींचा आराखडा मंजूर

- हितेन नाईकपालघर - जिल्हा वार्षिक नियोजनाच्या २०२० - २१ या वर्षासाठी ४०५ कोटी २४ लाखांच्या निधीचा आराखडा बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. निधी असूनही तो खर्च होत नसल्याने निधी परत गेल्यास जिल्ह्याच्या विकासाला बाधा पोहोचण्याची भीती कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. तर अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे निधी परत गेल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे असा दमही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी भरला.जिल्हा नियोजन समितीची सर्वसाधारण प्रारुप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आ. रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, विनोद निकोले, सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, दौलत दरोडा, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, पोलीस अधीक्षक गौरव सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाळ भारती तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा नियोजन समितीने मागील बैठकीतील इतिवृत्त आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनु.जाती उपयोजना (विशेष घटक योजना), जिल्हा आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र (ओटीएसपी) २०२९ - २० अंतर्गत ३१ डिसेंबर २०१९ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.जिल्ह्यातील विकासासाठी निधीची तरतूद असतानाही गेल्या दोन वर्षात विविध विभागातील अधिकाºयांच्या निष्क्रियतेमुळे २०१८ - १९ मध्ये ६७ टक्के तर तर २०१९ - २० मध्ये ७९ टक्केच निधी खर्च करण्यात आल्याचे दिसले. या असंवेदनशीलतेबाबत जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जे अधिकारी आपला निधी खर्च करण्यात कामचुकारपणा करतील, त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे, असा सज्जड दमच जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागांना भरला. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महिला बालकल्याण विभाग, तर महावितरण विभाग आदी विभागाचा निधी अखर्चीक राहिल्याने पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांनी ही नाराजी व्यक्त केली.एकूण अदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी २६२ कोटी २७ लाख रुपये, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी ५१ कोटी ०१ लाख रुपये असे एकूण आदिवासी घटकांसाठी ३१३ कोटी २८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. विशेष घटक कार्यक्रमांतर्गत ११९ कोटी ४ लाख रुपये तर सर्वसाधारणसाठी १२५ कोटी ९२ लाख रुपये असा निधी मंजूर केला. 

टॅग्स :palgharपालघरGovernmentसरकार