शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 23:46 IST

जिल्हा वार्षिक नियोजनाचा ४०५ कोटींचा आराखडा मंजूर

- हितेन नाईकपालघर - जिल्हा वार्षिक नियोजनाच्या २०२० - २१ या वर्षासाठी ४०५ कोटी २४ लाखांच्या निधीचा आराखडा बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. निधी असूनही तो खर्च होत नसल्याने निधी परत गेल्यास जिल्ह्याच्या विकासाला बाधा पोहोचण्याची भीती कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. तर अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे निधी परत गेल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे असा दमही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी भरला.जिल्हा नियोजन समितीची सर्वसाधारण प्रारुप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आ. रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, विनोद निकोले, सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, दौलत दरोडा, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, पोलीस अधीक्षक गौरव सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाळ भारती तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा नियोजन समितीने मागील बैठकीतील इतिवृत्त आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनु.जाती उपयोजना (विशेष घटक योजना), जिल्हा आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र (ओटीएसपी) २०२९ - २० अंतर्गत ३१ डिसेंबर २०१९ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.जिल्ह्यातील विकासासाठी निधीची तरतूद असतानाही गेल्या दोन वर्षात विविध विभागातील अधिकाºयांच्या निष्क्रियतेमुळे २०१८ - १९ मध्ये ६७ टक्के तर तर २०१९ - २० मध्ये ७९ टक्केच निधी खर्च करण्यात आल्याचे दिसले. या असंवेदनशीलतेबाबत जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जे अधिकारी आपला निधी खर्च करण्यात कामचुकारपणा करतील, त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे, असा सज्जड दमच जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागांना भरला. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महिला बालकल्याण विभाग, तर महावितरण विभाग आदी विभागाचा निधी अखर्चीक राहिल्याने पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांनी ही नाराजी व्यक्त केली.एकूण अदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी २६२ कोटी २७ लाख रुपये, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी ५१ कोटी ०१ लाख रुपये असे एकूण आदिवासी घटकांसाठी ३१३ कोटी २८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. विशेष घटक कार्यक्रमांतर्गत ११९ कोटी ४ लाख रुपये तर सर्वसाधारणसाठी १२५ कोटी ९२ लाख रुपये असा निधी मंजूर केला. 

टॅग्स :palgharपालघरGovernmentसरकार