शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कालकम बॅँकेविरोधात फसवणुकीची तक्रार, ग्राहकांचे मुदतठेवीनंतरही पैसे मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 02:51 IST

ट्विंकल, समृध्दी व आता कालकम नामक संस्थांनेही आपले हात वर करत ठेवीदारांचे पैसे मुदत पुर्ण झाल्यानंतरही परत देण्यास नकार दिला आहे.

- हुसेन मेमनजव्हार - ट्विंकल, समृध्दी व आता कालकम नामक संस्थांनेही आपले हात वर करत ठेवीदारांचे पैसे मुदत पुर्ण झाल्यानंतरही परत देण्यास नकार दिला आहे. या वित्तसंस्था दिवाळखोरीच्या मार्गावर असून येथील काही ग्राहकांनी कालकम बँके विरूध्दात जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.तालुक्यात खेडोपाड्यातील आदिवासी समाजाच्या गरीब लोकांना पैसे दुप्पट करुन देण्याच्या आमिषाने ३ वर्षे ते ५ वर्षे मुदत ठेवीत लाखो रूपये ठेवीच्या रूपात पैसे उकळण्याचे काम सोनार आळी येथील कालकम बॅँके मार्फत आले जात होते. मात्र, आता ट्विंकल व समृध्दी जीवन सारख्या योजनाद्वारे कालकम ने ठेवीदारांना फसवले असल्याचे आरोप होत आहेत. काही ग्राहकांच्या ठेवींना मुदत पुर्ण होऊन वर्ष तर काहींना ४ ते ५ महिने उलटले आहेत. मात्र, बॅँकेकडून परतावा मिळत नसल्याने ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत.सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत ग्राहक बॅकें बाहेर चकरा मारत असून तेथे शिपाया खेरीज कुणीही उपस्थित नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. शिपायाकडून एकच उत्तर मिळते की, तो फक्त एकच उत्तर देतो, मॅनेजर नाहीत. त्यामुळे ग्राहकवर्गाकडून कारवाईची मागणी होत आहे.आम्ही आमचे मुदत ठेवीचे पैसे मुदत पुर्ण झाल्यानंतर घेण्यासाठी आलो मात्र, आम्हाला पुढच्या महिन्यात देऊ, नंतर देऊ असे उडवा उडवीचे उत्तर दिली. आज मला मुदत संपुन ४ महिने पुर्ण झाले तरी मला रक्कम मिळालेली नाही.-सुरेश पानगा, ग्राहक, पवारपाडामी गरीब घराची असून एजन्टने गोडी गुलाबीने आमच्या कडून तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देऊ असे सांगून आमचे कष्टाचे पैसे घेतले. मात्र, आज आम्ही आमचे पैसे मागायला आलो तर बॅँक पैसे देत नाही, आमच्यावर तर उपासमाराची वेळ आली आहे.-मिरा वाघ, पिडीत ग्राहक, वाकीजव्हारच्या टीडीसी बँकेचे इंटरनेटअभावी व्यवहार ठप्पजव्हार शहरातील ठाणे मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने, ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. टीडीसी बँकेच्या बाहेर बँकेतील व्यवहार कधी चालू होतील म्हणून बँकेबाहेर दिवसभर पाण्या पावसात वाट पाहून ते घरी परतत आहेत. अनेकांचे व्यवहार थकल्याने नैराश्य आले आहे.शेतकरी वर्गाने घेतलेले पीक कर्ज फेडण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शिक्षकांना पगारासाठी याच बॅँकेचा आधार आहे. इंटरनेट आभावी बँक गेल्या पाच दिवसांपासून सतत बंद असल्याने सर्वांचे चांगलेच हाल झाले आहेत. विशेष करून जव्हारच्या टीडीसी बँकेत तहसीलदार कार्यालयाकडून वयोवृद्ध नागरिक, निराधार महिला, जेष्ट नागरिक तसेच पेशंनधारक नागरिकांना यांना पैसे मिळतात.हे ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला आपला नंबर लावण्यासाठी सकाळीच येऊन बसतात. मात्र, व्यवहार बंद असल्याने वाट पाहून निराश होवून परत जातात. याबाबत टीडीसी बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, आमची बीएसएनएल लाईन बंद झाली आहे. त्यामुळे नाईलाज आहे असे मोघम उत्तर दिले जाते.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक