शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बोटे तुटलेल्या कामगाराला कंपनीने सोडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 22:43 IST

वाड्यातील घटना : कामगाराची न्यायाची मागणी; चार महिन्यांपासून पगारही नाही आणि भरपाईही

वाडा : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करणाºया हिल्टन फोर्जिग मेटल कंपनीबद्दल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काम करीत असताना मशीनमध्ये हात अडकून एका कामगाराच्या उजव्या हाताची दोन बोटे निकामी झाली आहेत. मे महिन्यात ही घटना घडली. मात्र, या कामगाराला कंपनीने चार महिने पगार किंवा भरपाई न दिल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारही नाही आणि कामही नाही अशा द्विधा मनस्थितीत कामगार सापडला असून त्याने कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीकडे न्यायाची मागणी केली आहे.

वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत हिल्टन फोर्जिंग मेटल ही कंपनी आहे. या कंपनीत प्लाजेंसचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून राघवेंद्र उर्फ जयलाल चव्हाण (वय ३५) हा कामगार येथे काम करीत असून तो हॅमर चालवायचा. ९ मे २०१९ रोजी कंपनी व्यवस्थापनाने त्याचे नेहमीचे काम सोडून त्याला दुसºया मशीनवर काम दिले. ते मशीन त्याला चालवता येत नसल्याने राघवेंद्र याचा हात मशीनमध्ये अडकून उजव्या हाताची दोन बोटे तुटून अपघात झाला. त्यानंतर त्याला नजीकच्या एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान कंपनी प्रशासनाने त्याला तू पोलिसांत तक्र ार करू नको, तुला भरपाई देऊ आणि कामावर ठेवू असे सांगितले. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली नसल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र चार महिने उलटूनही त्याला पगार किंवा भरपाई दिली जात नाही. राघवेंद्र हा परप्रांतीय कामगार असून तो, पत्नी व दोन मुले असे ते अंबाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. चार महिन्यांत पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चार महिने घरभाडे न दिल्याने मालकानेही भाड्यासाठी तगादा लावला आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी पैसेच नसल्याने मुलाला शाळेतून काढले असल्याचा आरोप तक्र ारीत केला आहे. हा कामगार आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार असल्याने त्याच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय ? असा प्रश्न चव्हाण कुटुंबियांना पडला आहे. राघवेंद्र याने कंपनीत जाऊन पगार द्या व कामावर ठेवा असे सांगितले असता तू व्यवस्थित झाल्यावर कामावर ये असे सांगून पगाराबाबत कंपनी प्रशासन काहीही बोलत नसल्याचा आरोप कामगाराने केला आहे.यासंदर्भात कंपनीचे मालक युवराज मल्होत्रा यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता भेटल्यावर बोलू असे सांगत अधिक बोलणे टाळले.कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे राघवेंद्र या कामगाराला आपल्या हाताची बोटे गमवावी लागली असून कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. चार महिने त्याला पगार न दिल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडणार आहोत. तसे पत्र तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले आहे.- सुरेश भोईर, अध्यक्ष-शिवनेरी भुमिपुत्र कामगार संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार