शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोटे तुटलेल्या कामगाराला कंपनीने सोडले वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 22:43 IST

वाड्यातील घटना : कामगाराची न्यायाची मागणी; चार महिन्यांपासून पगारही नाही आणि भरपाईही

वाडा : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करणाºया हिल्टन फोर्जिग मेटल कंपनीबद्दल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काम करीत असताना मशीनमध्ये हात अडकून एका कामगाराच्या उजव्या हाताची दोन बोटे निकामी झाली आहेत. मे महिन्यात ही घटना घडली. मात्र, या कामगाराला कंपनीने चार महिने पगार किंवा भरपाई न दिल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारही नाही आणि कामही नाही अशा द्विधा मनस्थितीत कामगार सापडला असून त्याने कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीकडे न्यायाची मागणी केली आहे.

वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत हिल्टन फोर्जिंग मेटल ही कंपनी आहे. या कंपनीत प्लाजेंसचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून राघवेंद्र उर्फ जयलाल चव्हाण (वय ३५) हा कामगार येथे काम करीत असून तो हॅमर चालवायचा. ९ मे २०१९ रोजी कंपनी व्यवस्थापनाने त्याचे नेहमीचे काम सोडून त्याला दुसºया मशीनवर काम दिले. ते मशीन त्याला चालवता येत नसल्याने राघवेंद्र याचा हात मशीनमध्ये अडकून उजव्या हाताची दोन बोटे तुटून अपघात झाला. त्यानंतर त्याला नजीकच्या एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान कंपनी प्रशासनाने त्याला तू पोलिसांत तक्र ार करू नको, तुला भरपाई देऊ आणि कामावर ठेवू असे सांगितले. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली नसल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र चार महिने उलटूनही त्याला पगार किंवा भरपाई दिली जात नाही. राघवेंद्र हा परप्रांतीय कामगार असून तो, पत्नी व दोन मुले असे ते अंबाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. चार महिन्यांत पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चार महिने घरभाडे न दिल्याने मालकानेही भाड्यासाठी तगादा लावला आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी पैसेच नसल्याने मुलाला शाळेतून काढले असल्याचा आरोप तक्र ारीत केला आहे. हा कामगार आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार असल्याने त्याच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय ? असा प्रश्न चव्हाण कुटुंबियांना पडला आहे. राघवेंद्र याने कंपनीत जाऊन पगार द्या व कामावर ठेवा असे सांगितले असता तू व्यवस्थित झाल्यावर कामावर ये असे सांगून पगाराबाबत कंपनी प्रशासन काहीही बोलत नसल्याचा आरोप कामगाराने केला आहे.यासंदर्भात कंपनीचे मालक युवराज मल्होत्रा यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता भेटल्यावर बोलू असे सांगत अधिक बोलणे टाळले.कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे राघवेंद्र या कामगाराला आपल्या हाताची बोटे गमवावी लागली असून कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. चार महिने त्याला पगार न दिल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडणार आहोत. तसे पत्र तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले आहे.- सुरेश भोईर, अध्यक्ष-शिवनेरी भुमिपुत्र कामगार संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार