शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

वसई-विरारसह सर्व प्रवासीवर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:09 IST

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन सेवेचे लोकार्पण :  कोरोनाकाळापासून वसईत बंद होती बससेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार महापालिका हद्दीतील प्रवाशांसह इतरही प्रवासीवर्गास उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याकरिता पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच बुमसेवा देणारी कदाचित वसई-विरार महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचे सांगत खऱ्या अर्थी आजच्या दिवशी महापालिकेच्या वतीने अधिकृतपणे लोकार्पण झाले आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत केले.ते पुढे म्हणाले की, आम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशात विकासकामांची उद्घाटने करतो, तर विरोधक हे रात्रीच्या अंधारात उद्घाटन करतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी बविआला लगावला. एवढेच नाही तर ही परिवहन सेवा नागरिकांसाठी आहे, यात आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण आणत नाही. खरे तर यामध्ये सर्वांनी सहभागी होणे गरजेचे होते, मात्र ठीक आहे. बुम पद्धतीने सुरू झालेल्या या परिवहन सेवेचा आर्थिक भार पालिकेवर अजिबात राहणार नाही, तर यानंतरही अजून १५० बसेस येतील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आदींना सवलत आहेच, मात्र महापालिका व त्याच्या परिवहन विभागातर्फे यापुढेही नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नगरविकास मंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर अखेर शहरात बसेस धावू लागल्या. या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, पालिका आयुक्त गंगाथरन डी., शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, आमदार श्रीनिवास वनगा, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अविनाश जाधव यांना वसई न्यायालयाच्या आवारातच रोखले : पोलिसांना मिळाली होती गुप्त खबरn वसई-विरार महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा साजरा होताना दोघा मनसैनिकांनी कार्यक्रमस्थळी गुपचूप प्रवेश मिळवत, अचानकपणे आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली आणि या सोहळ्याला गालबोट लागले, तर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी वसई न्यायालयाच्या आवारातच रोखून धरले होते.n परिवहनसेवेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मनसेकडून गोंधळ घालण्यात येईल, याची गुप्त माहिती पोलिसांना आधीच मिळाल्यानंतर सर्वत्र वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, तरीही  दोन मनसेचे कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून कार्यक्रमात गेले व व्हायला नको तो प्रकार घडला. त्यावेळी प्रसंगावधान राखत शिवसैनिक व तुळींजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्या दोघांची धरपकड करत त्यांना तुळींज पोलीस ठाण्यात नेले.n जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, आयुक्त गंगाथरन आम्हाला वेळ देत नाहीत. आठ महिने झाले, वसईत १५ लाख चौरस मीटर भागावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही वेळ मागत आहोत आणि इतका पोलीस बंदोबस्त करूनही मनसेच्या आंदोलनाचा धसका घेत, मला वसईचे डीसीपी व एसीपी यांनी वसई कोर्ट परिसरातच कार्यक्रम संपेपर्यंत उभे ठेवले. तरीही आमचे दोन वाघ आत शिरून राडा केला. त्यांच्या कर्तृत्वावर गर्व आहे, असे सांगून पोलिसांनी आमच्या मनसैनिकांना घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहिली आहे, त्यांचाही लवकरच समाचार घेऊ.