शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनचा संप सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 02:10 IST

कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले

वसई : कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसºया दिवशी प्रशासन अथवा ठेकेदाराने दुर्लक्ष केले. तसेच दहा कामगारांना बडतर्फ केल्याने कामगार संतापले असून आंदोलन चिघळण्याची भिती आहे.किमान वेतन, वीमा संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेतील सर्व कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. संध्याकाळपर्यंत महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराने कामगारांशी कोणतीच बोलणी केली नाहीत. त्यामुळे बेमुदत संप करण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी केला. त्यामुळे सोमवारपासून परिवहन सेवेचे कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत.प्रशासन आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळेच बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागत असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कामगारांना किमान वीस हजार रुपये वेतन मिळायला हवे. त्यांना विमा संरक्षण द्यायला हवे. यासह कामगारांच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे पंडित यांनी सांगितले. पण, संपाच्या दुसºया दिवशीही प्रशासन अथवा ठेकेदाराने संपकरी कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे.दरम्यान, संपावर तोडगा काढण्याऐवजी ठेकेदाराने प्रवीण देवरुखकर, राजू मुलानी, महेश पवार, सुनील चव्हाण, वैभव शिगवण, नवनाथ आहिरे, दत्तूू राजपंखे, संकेत सावंत, प्रदीप चालके आणि आबासो कोळेकर यांना मंगळवारी नोटीस बजावून परिवहन सेवेतून बडतर्फ केले. त्यामुळे कामगारांध्ये संतापाची लाट पसरली आहे. कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असेही संघटनेच्यावतीने प्रशासनाला बजावण्यात आले आहे.>प्रवाशांचे हाल एसटीकडून दिलासापरिवहन सेवेच्या संपाचा फटका वसईकरांना बसू लागला आहे. दोन दिवसांपासून बसेस रस्त्यावर धावत नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. एसटी महामंडळाने सध्या अ़र्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपोतून काही मार्गावर बसेस सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, परिवहन संपाचा फायदा उचलत रिक्शाचालकांनी काही भागात प्रवाशांची अडवणूक करीत लुटमार सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे.