शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:08 IST

संडे अँकर । निसर्गाचा लहरीपणा : महागाई, कमी बाजार भावामुळे दुर्लक्ष

विक्रमगड : कमी कालावधीत आणि खाण्यास, गोडीस रुचकर असलेला गावठी कोलम झिनी तांदळाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घटत चालले आहे. पूर्वीप्रमाणे त्याची लागवड होत नसल्याने हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कमी बाजार भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई आणि निसर्गाच्या लहरीमुळे विक्रमगड तालुक्यातून घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्यांच्या भात पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे एक चांगल्या भात पिकाची जात धोक्यात आली आहे. सध्या हा तांदूळ बाजारात दुकानावर ५० ते ७० रु पये किलो दराने विकला जात आहे.

तरूणाई शेती उत्पादनाबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारित जातीच्या वाणाची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे. या तांदळाच्या उत्पादनासाठी मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही बराच आहे. या तांदळाचा दाणा लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठीक नाहीतर नुकसान सहन करावे लागते. परंतु या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे विक्रमगड येथील शेतकरी रणधीर पाटील यांनी सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी कोलम या भात पिकाचे उत्पादन सर्व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. एक सेंटीमीटर लांबीचा असणारा शुभ्र व आकर्षक दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा कोलम तांदूळ खाण्यासाठी अतिशय रु चकर म्हणून प्रसिद्ध आहे.

या तांदळाची सर्वत्र मोठी मागणी होती. परंतु कालांतराने शेतकरी आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाºया भात पिकाकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चिक असलेला कोलम तांदुळाचे उत्पादन घेण्याबाबत तो उदासीन झाला आहे.

पीक घेण्यास विलंब झाल्यास होते नुकसानकोलम जातीच्या भात लागवडीचा काळ मर्यादित आहे. त्याची लागवड तसेच लावणीही वेळेत होणे गरजेचे आहे. तर कधी नाही त्यामुळे हे पीक घेण्यास विलंब झाल्यास नुकसान सहन करावे लागते. आता निसर्गाचे काही खरे दिसत नसल्याने गेल्या चार पाच वर्षापासून गावठी कोलम तांदळाचे उत्पादन घट होताना दिसत आहे. तर काही शेतकरी महागाई व खर्चाचे प्रमाण पाहून आपली जमीन लागवड न करता लागवडीस दिल्या आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाकोलम भाताचे वाण उत्पादन घेण्यासाठी खर्चही तेवढाच करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. कारण गेल्या दोन चार वर्षात पाऊस वेळेत होत नाही व पाऊस वेळेत झाला तर तो उघडीप देण्याचे नाव घेत नाही. या सर्व गोष्टीमुळे हे चांगले पीक घेण्यासाठी केलेला खर्च वजा जाता उत्पन्न हाती लागत नसल्याने कोलम वाणाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तितकेसे तयार नसतात.- बबन साबरे, ओंदे, शेतकरी