शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:08 IST

संडे अँकर । निसर्गाचा लहरीपणा : महागाई, कमी बाजार भावामुळे दुर्लक्ष

विक्रमगड : कमी कालावधीत आणि खाण्यास, गोडीस रुचकर असलेला गावठी कोलम झिनी तांदळाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घटत चालले आहे. पूर्वीप्रमाणे त्याची लागवड होत नसल्याने हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कमी बाजार भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई आणि निसर्गाच्या लहरीमुळे विक्रमगड तालुक्यातून घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्यांच्या भात पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे एक चांगल्या भात पिकाची जात धोक्यात आली आहे. सध्या हा तांदूळ बाजारात दुकानावर ५० ते ७० रु पये किलो दराने विकला जात आहे.

तरूणाई शेती उत्पादनाबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारित जातीच्या वाणाची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे. या तांदळाच्या उत्पादनासाठी मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही बराच आहे. या तांदळाचा दाणा लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठीक नाहीतर नुकसान सहन करावे लागते. परंतु या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे विक्रमगड येथील शेतकरी रणधीर पाटील यांनी सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी कोलम या भात पिकाचे उत्पादन सर्व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. एक सेंटीमीटर लांबीचा असणारा शुभ्र व आकर्षक दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा कोलम तांदूळ खाण्यासाठी अतिशय रु चकर म्हणून प्रसिद्ध आहे.

या तांदळाची सर्वत्र मोठी मागणी होती. परंतु कालांतराने शेतकरी आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाºया भात पिकाकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चिक असलेला कोलम तांदुळाचे उत्पादन घेण्याबाबत तो उदासीन झाला आहे.

पीक घेण्यास विलंब झाल्यास होते नुकसानकोलम जातीच्या भात लागवडीचा काळ मर्यादित आहे. त्याची लागवड तसेच लावणीही वेळेत होणे गरजेचे आहे. तर कधी नाही त्यामुळे हे पीक घेण्यास विलंब झाल्यास नुकसान सहन करावे लागते. आता निसर्गाचे काही खरे दिसत नसल्याने गेल्या चार पाच वर्षापासून गावठी कोलम तांदळाचे उत्पादन घट होताना दिसत आहे. तर काही शेतकरी महागाई व खर्चाचे प्रमाण पाहून आपली जमीन लागवड न करता लागवडीस दिल्या आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाकोलम भाताचे वाण उत्पादन घेण्यासाठी खर्चही तेवढाच करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. कारण गेल्या दोन चार वर्षात पाऊस वेळेत होत नाही व पाऊस वेळेत झाला तर तो उघडीप देण्याचे नाव घेत नाही. या सर्व गोष्टीमुळे हे चांगले पीक घेण्यासाठी केलेला खर्च वजा जाता उत्पन्न हाती लागत नसल्याने कोलम वाणाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तितकेसे तयार नसतात.- बबन साबरे, ओंदे, शेतकरी