शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्हाधिकारीच उतरले कारवाईसाठी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:32 IST

पालघर/विरार : जिल्ह्यातील कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात केली असून तीन लग्न समारंभात धाड घालून गर्दी ...

पालघर/विरार : जिल्ह्यातील कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात केली असून तीन लग्न समारंभात धाड घालून गर्दी जमविणे, मास्क परिधान न करणे आदी कोविड-१९ गुन्ह्यांखाली वधू-वर पित्यासह आयोजकांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हे दाखल केले. दरम्यान, वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. 

मागील दोन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे शासन पातळीवरून लक्षात येऊ लागल्यानंतर कोविड-१९ अंतर्गत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाकडेही पूर्णतः दुर्लक्ष केले जाऊ लागल्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले आहे.

रविवारी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. किरण महाजन, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे आदींनी उमरोळी, सातपाटी आदी ठिकाणी लग्नसमारंभात धाडी घालून वधू-वर पिता, कॅटरर्स आदींविरोधात गुन्हे दाखल केले. 

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी पुढील आदेश येईपर्यंत पालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे विवाह समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती येणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच समाजिक अंतर, मास्कचा वापर व शासन आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार