शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२९ शाळा बंद

By admin | Updated: July 16, 2017 02:14 IST

तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील एकूण १२९ प्राथमिक शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या १ किमी अंतरावरील सोईस्कर ठरणाऱ्या शाळेत समायोजित

- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील एकूण १२९ प्राथमिक शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या १ किमी अंतरावरील सोईस्कर ठरणाऱ्या शाळेत समायोजित करण्याच्या प्रक्रियेला पालघर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या १२९ शाळा बंद होणार आहेत. ही कार्यवाही १५ जुलैपर्यंत पूर्ण करून सरल प्रणालीत समायोजित करून ३१ जुलै अखेरपर्यंत स्टुडंट पोर्टलला समावेशीत करण्यात येणार आहे. दरम्यान या धोरणामुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदं भरली जाणार असून नववीच्या अतिरिक्त तुकड्या निर्माण होऊन प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासह विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ नुसार प्राथमिक शिक्षणासाठी १ किमी अंतराची अट निर्धारित केली आहे. त्या नियमांच्या अधीन राहून ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या ३० पेक्षा कमी आहे, त्या शाळेतील विद्यार्थी त्यांना सोईस्कर ठरणाऱ्या १ किमी अंतराच्या आत असलेल्या अन्य शाळेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या बंद होणाऱ्या शाळांचे अभिलेख नियमाप्रमाणे दुसऱ्या शाळेने जतन करून ठेवायचे आहेत. शिवाय अशा शाळेतील शिक्षकांना रिक्तपदं असणाऱ्या शाळेत अध्यापनासाठी पाठवून त्या समायोजित शिक्षकांचा प्रस्ताव कार्यालयाला सादर केला जाणार आहे. याबाबतचे आदेश तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असून कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील १२९ शाळा बंद होणार असून त्या मध्ये पालघर ३८, डहाणू ३१, जव्हार २३, वसई २२, विक्र मगड १०, मोखाडा ५ आणि तलासरी १ या तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यानंतर शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आठवीच्या वर्गाला नववीचा वर्ग जोडल्याने प्रवेशाचा प्रश्न संपुष्टात येईल. शिक्षकांची रिक्तपदं भरली जाऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल. शिवाय जिल्ह्यातील ६०० शाळांचा दुरु स्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये बंद होणाऱ्या शाळांचाही समावेश असल्याने भौतिक सुविधांवर होणारा खर्च वाचणार आहे. हे सर्व मुद्दे शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले होते. त्यासह राज्याच्या शिक्षण विभागाकडे सादरीकरण केले होते. त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबाजवणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी रायगड जिल्हा परिषदेने या पद्धतीचा निर्णय घेतला होता, मात्र अंलबजावणी केली नव्हती. अशी माहिती पालघर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. या निर्णयाने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून तर, शिक्षक नोकरीपासून वंचित राहणार नसल्याने शिक्षक संघटनेकडून विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या धोरणामुळे विद्यार्थी प्रवेश, शिक्षकांची रिक्तपदं, शाळांच्या भौतिक सुविधा आदि प्रश्न सुटतील. त्यानुसार ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हातील १२९ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन लगतच्या १ किमी अंतराच्या क्षेत्रातील सोईस्कर अशा अन्य शाळेत केले जाणार आहे. -संगीता भागवत, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद