शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सहा महिन्यापासून टॉवर बंद, मोबाइल नोट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:47 IST

डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.तालुक्यातील आदिवासी भागातील सायवन येथे सात वर्षांपूर्वी परिसरात गावासाठी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर टॉवर सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात येणारी सायवन, चळणी, गांगोडी, निंबापूर, बांधघर, बापुगाव, शेणसरी, रामपूर, किन्हवली, दिवशी, दाभाडी या गाव पाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोबाईल फोन नोट रिचेबल तसेच सर्वच आॅनलाइन सह आरोग्य सेवा व बँकिंग सेवेवरही परिणाम झाला आहे.सायवन येथे बँक आॅफ महाराष्ट्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी बँकांच्या शाखा आहेत. बँकांचे सर्व व्यवहार इंटरनेटमार्फत होतात. मात्र नेट नसल्याने बँकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. आर्थिक व्यवहारासाठी दररोज ग्राहकांच्या रांगा सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यं लागतात. वृद्ध, निवृत्ती वेतन धारक, महिला, विद्यार्थी, तासन तास रांगेत टाळकत उभे राहतात. कधीतरी पहिल्या दिवशी नंबर लागत नसल्याने. दुसऱ्या दिवशी पुन्हा फेºया माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात सतत वाद होतात.सायवन येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत पंधरा गावे येतात. या परिसरातील संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असून येथील नागरिक आरोग्य सेवेसाठी पूर्णपणे सायवन आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मात्र गंभीर परिस्थितीत सर्पदंश, गर्भवती महिला अशा वेळी १०८ सारख्या रुग्णसेविका सेवेशी संपर्क करता येत नाही. तसेच परिसरातील शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी विविध माहिती आॅनलाईन पाठवावी लागते. मात्र नेट नसल्याने मोठी अडचण होते. त्या साठी त्यांना दररोज पाच सहा किमी नेटवर्क असलेल्या भागात यावे लागते.सायवन येथील ग्रामस्थांना निकडीच्या वेळेस गावापासून एक किमी पुढे उंच टेकडीवर जावे लागते. परंतु दरवेळेस रात्री अपरात्री येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे तात्काळ मोबाईल टॉवर सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.सायवन भागात सहा महिन्यांपासून दूरध्वनी सेवा बंद आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होते.- रमेश मोरे, सायवन

टॅग्स :Vasai Virarवसई विरार