शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सहा महिन्यापासून टॉवर बंद, मोबाइल नोट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:47 IST

डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.तालुक्यातील आदिवासी भागातील सायवन येथे सात वर्षांपूर्वी परिसरात गावासाठी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर टॉवर सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात येणारी सायवन, चळणी, गांगोडी, निंबापूर, बांधघर, बापुगाव, शेणसरी, रामपूर, किन्हवली, दिवशी, दाभाडी या गाव पाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोबाईल फोन नोट रिचेबल तसेच सर्वच आॅनलाइन सह आरोग्य सेवा व बँकिंग सेवेवरही परिणाम झाला आहे.सायवन येथे बँक आॅफ महाराष्ट्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी बँकांच्या शाखा आहेत. बँकांचे सर्व व्यवहार इंटरनेटमार्फत होतात. मात्र नेट नसल्याने बँकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. आर्थिक व्यवहारासाठी दररोज ग्राहकांच्या रांगा सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यं लागतात. वृद्ध, निवृत्ती वेतन धारक, महिला, विद्यार्थी, तासन तास रांगेत टाळकत उभे राहतात. कधीतरी पहिल्या दिवशी नंबर लागत नसल्याने. दुसऱ्या दिवशी पुन्हा फेºया माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात सतत वाद होतात.सायवन येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत पंधरा गावे येतात. या परिसरातील संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असून येथील नागरिक आरोग्य सेवेसाठी पूर्णपणे सायवन आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मात्र गंभीर परिस्थितीत सर्पदंश, गर्भवती महिला अशा वेळी १०८ सारख्या रुग्णसेविका सेवेशी संपर्क करता येत नाही. तसेच परिसरातील शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी विविध माहिती आॅनलाईन पाठवावी लागते. मात्र नेट नसल्याने मोठी अडचण होते. त्या साठी त्यांना दररोज पाच सहा किमी नेटवर्क असलेल्या भागात यावे लागते.सायवन येथील ग्रामस्थांना निकडीच्या वेळेस गावापासून एक किमी पुढे उंच टेकडीवर जावे लागते. परंतु दरवेळेस रात्री अपरात्री येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे तात्काळ मोबाईल टॉवर सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.सायवन भागात सहा महिन्यांपासून दूरध्वनी सेवा बंद आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होते.- रमेश मोरे, सायवन

टॅग्स :Vasai Virarवसई विरार