शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्री सदस्यांची जिल्ह्यात ७० विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:00 IST

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही स्थिती उघड असतांना जिथे अनेकांनी पाणी विक्रीची दुकानदारी सुरु केल्याचे विदारकता दिसत असतांना जिल्ह्यातील तब्बल ६५० श्री सदस्यांनी विविध तालुक्यातील ७० विहिरी श्रमदानाद्वारे स्वच्छ करुन जनसामान्य व सेवाभावी संस्थांना एक वस्तूपाठ आखुन दिला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईची मोठी झळ पोचल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात कोसो मैलाची पायपीट करावी करावी लागत असल्याने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाद्वारे शेकडो विहीरीमधील गाळ काळण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळत असताना गावागावातील विहिरी आणि बोअरवेल मध्ये गाळ साचत पाण्याचे स्त्रोत्र बंद झाले होते. याचा परिणाम आदिवासी बहुल भागासह शहरी भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. त्यामुळे पाण्या अभावी नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करण्याच्या विचाराने धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाऊल उचलण्यात आले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या विचारातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर,प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मुलन, समाजातील घटकांवर मार्गदर्शन आणि मदत कार्य, पाणपोई व्यवस्था, स्वच्छता अभियान विहीर स्वच्छता अभियान जलपुनर्भरण अभियान अशा अनेक उपक्र मांतून समाज सेवा चे कार्य देशभरात अखंड चालू आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून महाराष्ट्र शासनामार्फत २००८ मध्ये डॉ. नानासाहेब तथा (नारायण) धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तीर्थरूप आप्पासाहेब तथा (दत्तात्रेय) धर्माधिकारी यांना केंद्र शासनाद्वारे २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.- विविध गावांमधून दि. ३० मे, बुधवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून अभियानाला सुरूवात करण्यात आली. पालघर जिल्ह्यांमधून एकूण ७० विहिरीमधून ओला १८.१९५ टन व सुका १.८२५ टन गाळ काढण्यात आला. हे अभियान पालघर जिल्ह्यातील सफाळे, विराथन, पालघर, बोईसर, नवापूर, तारापूर, चिंचणी, केव, कांदरवन, कोरे, मासवण, नावझे, शिरगाव, मुरबे, मनोर, डहाणू. धाकटी- डहाणू, नागझरी, उंबरगाव, सातपाटी, वडराई, केळवे, अशा विविध गावांमध्ये ६५० श्री सदस्यांनी या उपक्र मात सहभागी होत स्वत: विहिरीत उतरून स्वच्छता केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार