शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

श्री सदस्यांची जिल्ह्यात ७० विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:00 IST

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही स्थिती उघड असतांना जिथे अनेकांनी पाणी विक्रीची दुकानदारी सुरु केल्याचे विदारकता दिसत असतांना जिल्ह्यातील तब्बल ६५० श्री सदस्यांनी विविध तालुक्यातील ७० विहिरी श्रमदानाद्वारे स्वच्छ करुन जनसामान्य व सेवाभावी संस्थांना एक वस्तूपाठ आखुन दिला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईची मोठी झळ पोचल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात कोसो मैलाची पायपीट करावी करावी लागत असल्याने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाद्वारे शेकडो विहीरीमधील गाळ काळण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळत असताना गावागावातील विहिरी आणि बोअरवेल मध्ये गाळ साचत पाण्याचे स्त्रोत्र बंद झाले होते. याचा परिणाम आदिवासी बहुल भागासह शहरी भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. त्यामुळे पाण्या अभावी नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करण्याच्या विचाराने धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाऊल उचलण्यात आले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या विचारातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर,प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मुलन, समाजातील घटकांवर मार्गदर्शन आणि मदत कार्य, पाणपोई व्यवस्था, स्वच्छता अभियान विहीर स्वच्छता अभियान जलपुनर्भरण अभियान अशा अनेक उपक्र मांतून समाज सेवा चे कार्य देशभरात अखंड चालू आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून महाराष्ट्र शासनामार्फत २००८ मध्ये डॉ. नानासाहेब तथा (नारायण) धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तीर्थरूप आप्पासाहेब तथा (दत्तात्रेय) धर्माधिकारी यांना केंद्र शासनाद्वारे २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.- विविध गावांमधून दि. ३० मे, बुधवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून अभियानाला सुरूवात करण्यात आली. पालघर जिल्ह्यांमधून एकूण ७० विहिरीमधून ओला १८.१९५ टन व सुका १.८२५ टन गाळ काढण्यात आला. हे अभियान पालघर जिल्ह्यातील सफाळे, विराथन, पालघर, बोईसर, नवापूर, तारापूर, चिंचणी, केव, कांदरवन, कोरे, मासवण, नावझे, शिरगाव, मुरबे, मनोर, डहाणू. धाकटी- डहाणू, नागझरी, उंबरगाव, सातपाटी, वडराई, केळवे, अशा विविध गावांमध्ये ६५० श्री सदस्यांनी या उपक्र मात सहभागी होत स्वत: विहिरीत उतरून स्वच्छता केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार