शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शहर एसटीबंदचा विद्यार्थ्यांना फटका, कुडकुडत्या थंडीत रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:17 IST

एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

वसई : एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. परिवहनची बस न आल्याने दीड तास थंडीत कुड़कुडत उभे राहिलेले विद्यार्थी कंटाळून घरी परतले. त्यामुळे विद्यार्थी एक दिवस शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.वसई पश्चिम पट्टयातील हजारो विद्यार्थ्यांसाठी पहाटे सहा पासून एसटी महामंडळ शालेय बस सेवा देत असे. मात्र, या मार्गावर परिवहन सेवा बस सुरु करीत असल्याने वाहतूक बंद करीत असल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी मंगळवारी प्रांताधिकाºयांना दिले. प्रत्यक्षात मात्र वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा दिली नाही.निर्मळ, भुईगाव, गास, गिरीज आणि परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी सेंट अँथोनी कॉन्व्हेंट हायस्कूल कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वसई, सेंट थॉमस ज्युनियर कॉलेज पापडी आणि सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता एसटीची शालेय बस सेवा होती. पण, प्रांताधिकाºयांसमोर झालेल्या बैठकीत परिवहनच्या प्रतिनिधीने सकाळची शालेय बससेवा सुरु करू असे आश्वासन दिल्याने एसटीने बुधवारी सकाळपासून बससेवा बंद केली. मात्र, परिवहनने शालेय बस सेवा दिली नाही.वसईतील २१ मार्गावरील एसटी बंद करण्याच्या महामंडळाच्या निर्णयावर जनहित याचिका अंतिम सुनावणी दरम्यान ७ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने २१ मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना प्रवास करतांना कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता एसटी महामंडळ आणि महापालिका परिवहन सेवा या दोघांना संयुक्तपणे वाहतूक सेवा देणे बंधनकारक आहे असा आदेश दिला होता. त्यानंतर महामंडळाने २१ मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात महापालिका परिवहन सेवा देण्यास तयार आहे असे जाहिर करण्यात आले होते. परंतु, परिवहनच्या अपुºया सेवेचा फटका प्रवासी सहन करीत असताना आता विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे, असा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. बुधवारी विद्यार्थ्यांचे झालेले शालेय नुकसान आणि मनस्तापाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल जनआंदोलन समितीने विचारला आहे. एक दोन दिवस परिवहन आणि एसटीचा ताळमेळ बघू मग जनता, रस्त्यावर उतरतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी आणि महापालिका जबाबदार असेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप