शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहर एसटीबंदचा विद्यार्थ्यांना फटका, कुडकुडत्या थंडीत रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:17 IST

एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

वसई : एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. परिवहनची बस न आल्याने दीड तास थंडीत कुड़कुडत उभे राहिलेले विद्यार्थी कंटाळून घरी परतले. त्यामुळे विद्यार्थी एक दिवस शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.वसई पश्चिम पट्टयातील हजारो विद्यार्थ्यांसाठी पहाटे सहा पासून एसटी महामंडळ शालेय बस सेवा देत असे. मात्र, या मार्गावर परिवहन सेवा बस सुरु करीत असल्याने वाहतूक बंद करीत असल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी मंगळवारी प्रांताधिकाºयांना दिले. प्रत्यक्षात मात्र वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा दिली नाही.निर्मळ, भुईगाव, गास, गिरीज आणि परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी सेंट अँथोनी कॉन्व्हेंट हायस्कूल कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वसई, सेंट थॉमस ज्युनियर कॉलेज पापडी आणि सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता एसटीची शालेय बस सेवा होती. पण, प्रांताधिकाºयांसमोर झालेल्या बैठकीत परिवहनच्या प्रतिनिधीने सकाळची शालेय बससेवा सुरु करू असे आश्वासन दिल्याने एसटीने बुधवारी सकाळपासून बससेवा बंद केली. मात्र, परिवहनने शालेय बस सेवा दिली नाही.वसईतील २१ मार्गावरील एसटी बंद करण्याच्या महामंडळाच्या निर्णयावर जनहित याचिका अंतिम सुनावणी दरम्यान ७ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने २१ मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना प्रवास करतांना कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता एसटी महामंडळ आणि महापालिका परिवहन सेवा या दोघांना संयुक्तपणे वाहतूक सेवा देणे बंधनकारक आहे असा आदेश दिला होता. त्यानंतर महामंडळाने २१ मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात महापालिका परिवहन सेवा देण्यास तयार आहे असे जाहिर करण्यात आले होते. परंतु, परिवहनच्या अपुºया सेवेचा फटका प्रवासी सहन करीत असताना आता विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे, असा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. बुधवारी विद्यार्थ्यांचे झालेले शालेय नुकसान आणि मनस्तापाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल जनआंदोलन समितीने विचारला आहे. एक दोन दिवस परिवहन आणि एसटीचा ताळमेळ बघू मग जनता, रस्त्यावर उतरतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी आणि महापालिका जबाबदार असेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप