शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणीत पारंपरिक दशावतारी नाटकांचा झाला बहारदार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:55 IST

तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.या गावातील सोनार आणि गुजराती कलावंतांनी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मागील दीडशेहून अधिक वर्षांची वंशपरंपरागत बांधिलकीची धुरा आजची आधुनिक पिढी त्याच भावनेने जपतांना दिसते आहे. परंपरेने चालत आलेल्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी १० ते १२ मे रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला.त्यानुसार विधिवत कलश पूजनानंतर देवी-देवतांना आवाहन करून ग्रामस्थांना आमंत्रीत करण्यात आले. त्याला पंचक्रोशीतील नागरिकांचीही उपस्थिती लाभली. शनिवारी रात्री ९ वाजता प्रारंभ होऊन गणपती आणि डाबदुब्या यांचा नाच झाला. त्यानंतर शंखासूर आणि भगवान विष्णू यांचा मत्स्यअवतार यातील द्वंद्व रंगले. त्यामध्ये विष्णूंचा विजय झाला. त्यानंतर बकसुराचा वध करण्यासाठी भीम अवतरले. तर त्राटिका राक्षसीणीच्या वधाकरिता हनुमंताने विजय प्राप्त केल्यानंतर पहिल्या रात्रीची सांगता झाली. दुसºया रात्री वाली आणि सुग्रीव यांचे नृत्य रंगले, त्यानंतर गजासुर दैत्याचा वध भगवान शंकराने स्वत: प्रकट होऊन केला. दक्ष प्रजापतीचा वध भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराने केला. शिवाय मणी आणि मल्ला ह्या दोन दैत्यांच्या वधावेळी उपस्थितांची उत्सुकता ताणली गेली होती. पुन्हा एकदा शंकरांनी खंडोबांचा अवतार धारण करून त्यांचा खातमा केला. हिरण्यकशपूचा वध भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन केला. तर पहाटेच्या सुमारास महिषासुर आणि भवानी यांच्यात तुल्यबळ युद्धाचा थरार रंगला.दरम्यान रविवारी पहाटे भवानी देवी महिषासुराचा वध करून समुद्रिमाता मंदिरात जाते. तिथे देवीची परंपरेनुसार पूजा पार पडल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या घरी देवीची रूढी परंपरेनुसार ओटी भरून या दशाअवताराची सांगता झाली. या पारंपरिक खेळामुळे या गावाला पंचक्रोशीत विशेष ओळख प्राप्त झाली आहे. या गावच्या जाज्वल्य इतिहासाला अखंड परंपरा लाभावी म्हणून नवीन पिढी सक्रिय असल्याचे दिसून आले.गावातील पिंपळनाका येथे या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात भाग घेणारे कलाकार वंशपरंपरागत त्याच ठरलेल्या कुटुंबातील आहेत. वडील आणि आजोबा-पणजोबांचा वारसा ही आधुनिकपिढी त्याच जबाबदारीतून सांभाळते आहे. त्यापैकी काही कलाकार नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईला स्थायिक झाले असले तरी दरवर्षी उत्सव काळात ते आपले योगदान देत आहेत.दरम्यान कोणता कलाकार कोणते पात्र वठवतोय त्याचे गुपीत आजही उलगडलेले नाही. हे येथील विशेष आहे. कारण तसे झाल्यास कुतूहल संपेल शिवाय सामाजिक जीवनात त्या पात्रावरून कलाकाराला कोणत्याही प्रकारचे बोल ऐकायला लागू नये हा उदात्तभाव स्थानिकांनी बोलून दाखवला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार