शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रांना मुख्यमंत्र्यांचे अभय

By admin | Updated: March 22, 2017 01:19 IST

वसई विरार महापालिकेतील राखीव प्रभागातून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने

शशी करपे / वसईवसई विरार महापालिकेतील राखीव प्रभागातून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याने मंजूर केला आहे. त्यावर नगरविकास खात्यातील अवर सचिव, उपसचिव आणि सचिवांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून टेबलावर पडून असलेल्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री सही करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.वसई विरार महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक १४ जून २०१५ रोजी होऊन १५ जून २०१५ रोजी निकाल लागला. त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका नियम कलम ५ (ब) नुसार ४१ नवनिर्वाचित नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत ३० जून २०१५ आणि ३ आॅक्टोबर २०१५ रोजी कळवण्यात आले होते. यापैकी ३६ नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले होते. मात्र, बहुजन विकास आघाडीचे हेमांगी विनोद पाटील, शबनम आरीफ शेख, अतुल रमेश साळुंखे, समीर जिकर डबरे यांच्यासह शिवसेनेचे स्वप्नील अविनाश बांदेकर यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी १७ मे २०१६ रोजी नगरविकास खात्याच्या अवर सचिवांना दिलेल्या अहवालात विहीत मुदतीत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या पाच नगरसेवकांना बडतर्फ करण्यासंबंधी आदेश निर्गमित करण्याची विनंती केली होती. शिवसेनेचे स्वप्निल बांदेकर यांनी चार दिवस उशिरा, अतुल साळुंखे यांनी चौदा दिवस उशिरा, शबनम शेख यांनी १८ दिवस उशिरा व हेमांगी पाटील यांनी १६ दिवस उशिराने जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. तर समीर डबरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दावा प्रलंबित आहे. त्यामुळे या पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्तांच्या पत्रानंतर नगरविकास खात्याने तयार केला आहे.नगरविकास खात्याचे अवर सचिव अजित कवडे यांनी पाचही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावे असा प्रस्ताव १८ आॅगस्ट २०१६ रोजी तयार केला आहे. वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केलेली वस्तुस्थिती आणि नगरविकास विभागाच्या परिपत्रका अन्वये प्राप्त अधिकारानुसार हेमांगी पाटील, शबनम शेख, अतुल साळुंखे, समीर डबरे आणि स्वप्नील बांदेकर यांची नगरसेवपदी झालेली निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्दबातल झाल्याचे समजण्यात यावे व त्यांना पालिका सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात यावे, असे अवर सचिव कवडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या प्रस्तावात स्पष्टपणे म्हटले आहे. १८ आॅगस्ट २०१६ रोजी कवडे यांनी प्रस्ताव तयार केला असून त्यावर उपसचिवांनी १८ आॅगस्ट २०१६ आणि सचिवांनी १९ आॅगस्ट २०१६ रोजी सह्या केल्या आहेत. त्यानंतर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून राहिला आहे. त्यांना ही एक सही ठोकण्यासाठी वेळ कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.