शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

उपवन तलावातील छटपूजा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:33 IST

आयोजकांमध्ये पडले दोन गट । मनसे घेणार पाण्याचे नमुने

ठाणे : ठाण्यातील उपवन परिसरात शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या आणि रविवारी होत असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने अयोजकांमध्येच दोन गट पडल्याने अंतर्गत वातावरण चांगलेच तापले होते. यातील एका आयोजक गटाने कृत्रिम तलाव परिसरात पूजा करण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या गटाने नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्ताने वादंग होण्याची चिन्हे आहेत.

स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून रुद्र प्रतिष्ठानने उपवनच्या कृत्रिम तलाव परिसरात ही पूजा करण्याचा निर्णय घेतला असून या गटाला मनसेनेदेखील पाठिंबा दर्शवला आहे. तर, छटपूजा संस्था ठाणेने पूजेला येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा कृत्रिम तलाव अतिशय अपुरा असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्त दोन्ही गटांच्या वतीने यानिमित्त शक्तिप्रदर्शन केल्याचे समोर आले आहे.ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून उपवन तसेच शहरातील अन्य ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. शनिवारी संध्याकाळपासून या छटपूजेला सुरु वात करण्यात आली असून शनिवारीदेखील ती होत आहे. मात्र, यानिमित्ताने होणारा संघर्ष हा मनसे आणि छटपूजा आयोजकांमध्ये कमी, मात्र तिचे आयोजन करणाºया दोन आयोजकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.उपवन तलाव परिसरात दोन ठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात आले असून एका बाजूला पालिका प्रशासनाने बांधून दिलेल्या कृत्रिम तलाव परिसरात ती होत आहे. या परिसरात रु द्र प्रतिष्ठान आणि ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. दुसरीकडे छटपूजा संस्थेच्या वतीने पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरात सर्व प्रकारची तयारी करून पूजेचे आयोजन केले आहे.रु द्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या छटपूजेचे आयोजक धनंजय सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने जो कृत्रिम तलाव तयार केला आहे, त्याच परिसरात ती होणे योग्य असल्याचे सांगितले.या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून नैसर्गिक तलावालादेखील कोणत्याही प्रकारची बाधा येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सुविधा निर्माण करण्यामध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचेदेखील मोलाचे योगदान असून केवळ नैसर्गिक तलाव परिसरात ही पूजा करणे, ही योग्य भूमिका नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे छटपूजा संस्थेचे आयोजक सुखचंद पाठक यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी येणाºया भाविकांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव परिसरात भाविक मावणार नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत कृत्रिम तलाव मोठा केला जाणार नाही, तोपर्यंत नैसर्गिक तलाव परिसरातच पूजा केली जाणार असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कोर्टात जाणार असून सह्यांची मोहीमदेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जलप्रदूषण आढळल्यास तक्रार करणारकृत्रिम तलाव परिसरात छटपूजेचे आयोजन करावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाºया मनसेच्या वतीने पूजा झाल्यानंतर उपवन तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. यात जलप्रदूषण आढळल्यास याविरोधात तक्र ार करणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी दिली. प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी ऐनवेळी जर पूजेनिमित्त येणाºयांची संख्या वाढली आणि जर कृत्रिम तलावाचा वापर न करता उपवन तलावात प्रदूषण करणारे घटक टाकले गेले, तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे