शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:20 IST

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

पालघर : गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीआयडी) पूर्ण करीत न्यायालयासमोर १० हजार ८७६ पानांचे आरोपपत्र ठेवले. या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) असे दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. चोर किंवा आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यास आल्या असल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय अथवा धर्माचा रंग न देण्याचे आवाहन करत पालघर पोलिसांकडून तपास काढून सीआयडीकडे सोपविला होता.

या प्रकरणात तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यावर ‘स्लॅक सुपर व्हिजन’चा ठपका ठेवीत त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे, एक उपनिरीक्षक आणि अन्य ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ४० कर्मचाºयांच्या तात्काळ बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. यानंतर कासा पोलीस ठाण्याचा कारभार कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नवी मुंबईच्या कोकण भवन येथील गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण २१ एप्रिल रोजी हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पवार आणि इरफान शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी प्रथम या प्रकरणाचे व्हिडीओ, फोटो, आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७ आदी विविध कलमान्वये आपत्ती निवारण कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ५२, ५४, साथरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१)(३) १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमअन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. २१ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या तपासानंतर बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.अफवेमुळेच घडले हत्याकांडदोन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी १२६ आरोपींविरोधात ४,९५५ पानांचे आरोपपत्र तर दुसºया गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी ही १२६ आरोपींविरोधात ५९२१ पानांचे आरोपपत्र डहाणू न्यायालयापुढे बुधवारी दाखल केले. या हत्याकांड प्रकरणी तपास करणाºया पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. हत्याकांड प्रकरणी दाखल आरोपपत्रात तिघांचे झालेले हत्याकांड हे धार्मिक हेतूने झाले नसून एका अफवेच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पुढे येत आहे.या हत्या मुले पळविण्याच्या अफवेमुळेच झाल्या, हे आता आरोपपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण होण्याआधीच काहींनी या घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. कोरोना साथीचे संकट असूनही ‘सीआयडी’ पथकाने नेटाने तपास करून वेळेत आरोपपत्र सादर केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Courtन्यायालयpalgharपालघर