शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:20 IST

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

पालघर : गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीआयडी) पूर्ण करीत न्यायालयासमोर १० हजार ८७६ पानांचे आरोपपत्र ठेवले. या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) असे दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. चोर किंवा आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यास आल्या असल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय अथवा धर्माचा रंग न देण्याचे आवाहन करत पालघर पोलिसांकडून तपास काढून सीआयडीकडे सोपविला होता.

या प्रकरणात तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यावर ‘स्लॅक सुपर व्हिजन’चा ठपका ठेवीत त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे, एक उपनिरीक्षक आणि अन्य ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ४० कर्मचाºयांच्या तात्काळ बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. यानंतर कासा पोलीस ठाण्याचा कारभार कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नवी मुंबईच्या कोकण भवन येथील गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण २१ एप्रिल रोजी हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पवार आणि इरफान शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी प्रथम या प्रकरणाचे व्हिडीओ, फोटो, आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७ आदी विविध कलमान्वये आपत्ती निवारण कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ५२, ५४, साथरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१)(३) १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमअन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. २१ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या तपासानंतर बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.अफवेमुळेच घडले हत्याकांडदोन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी १२६ आरोपींविरोधात ४,९५५ पानांचे आरोपपत्र तर दुसºया गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी ही १२६ आरोपींविरोधात ५९२१ पानांचे आरोपपत्र डहाणू न्यायालयापुढे बुधवारी दाखल केले. या हत्याकांड प्रकरणी तपास करणाºया पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. हत्याकांड प्रकरणी दाखल आरोपपत्रात तिघांचे झालेले हत्याकांड हे धार्मिक हेतूने झाले नसून एका अफवेच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पुढे येत आहे.या हत्या मुले पळविण्याच्या अफवेमुळेच झाल्या, हे आता आरोपपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण होण्याआधीच काहींनी या घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. कोरोना साथीचे संकट असूनही ‘सीआयडी’ पथकाने नेटाने तपास करून वेळेत आरोपपत्र सादर केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Courtन्यायालयpalgharपालघर