शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:20 IST

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

पालघर : गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीआयडी) पूर्ण करीत न्यायालयासमोर १० हजार ८७६ पानांचे आरोपपत्र ठेवले. या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) असे दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. चोर किंवा आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यास आल्या असल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय अथवा धर्माचा रंग न देण्याचे आवाहन करत पालघर पोलिसांकडून तपास काढून सीआयडीकडे सोपविला होता.

या प्रकरणात तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यावर ‘स्लॅक सुपर व्हिजन’चा ठपका ठेवीत त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे, एक उपनिरीक्षक आणि अन्य ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ४० कर्मचाºयांच्या तात्काळ बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. यानंतर कासा पोलीस ठाण्याचा कारभार कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नवी मुंबईच्या कोकण भवन येथील गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण २१ एप्रिल रोजी हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पवार आणि इरफान शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी प्रथम या प्रकरणाचे व्हिडीओ, फोटो, आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७ आदी विविध कलमान्वये आपत्ती निवारण कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ५२, ५४, साथरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१)(३) १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमअन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. २१ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या तपासानंतर बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.अफवेमुळेच घडले हत्याकांडदोन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी १२६ आरोपींविरोधात ४,९५५ पानांचे आरोपपत्र तर दुसºया गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी ही १२६ आरोपींविरोधात ५९२१ पानांचे आरोपपत्र डहाणू न्यायालयापुढे बुधवारी दाखल केले. या हत्याकांड प्रकरणी तपास करणाºया पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. हत्याकांड प्रकरणी दाखल आरोपपत्रात तिघांचे झालेले हत्याकांड हे धार्मिक हेतूने झाले नसून एका अफवेच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पुढे येत आहे.या हत्या मुले पळविण्याच्या अफवेमुळेच झाल्या, हे आता आरोपपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण होण्याआधीच काहींनी या घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. कोरोना साथीचे संकट असूनही ‘सीआयडी’ पथकाने नेटाने तपास करून वेळेत आरोपपत्र सादर केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Courtन्यायालयpalgharपालघर