शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:28 IST

पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.

पालघर : पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.विश्रामपूर (खडकोली) येथे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, बॅफ व बीएमएसच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर संपन्न झाले आहे. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी विश्रामपूर गावात स्वच्छता अभियान राबविले, १० शौच खड्डे खोदण्यात आले, झाडांच्या वाढीच्यादृष्टीने सागाच्या झाडांची फूट विरणी करण्यात आली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुऊन विद्यार्थ्यांची नखे काढण्यात आली, तसेच नदीच्या पाण्यातील गाळ काढून पाणी अडविण्याच्या दृष्टीने ४५ फुट लांबीचा वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व बौद्धिक विकासासाठी डॉ. उमेश दुम्पलवार, पत्रकार निरज राऊत, पंकज राऊत, प्रशांत पाटील, डॉ. हेमंत मुकणे आदींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिबिरा दरम्यान मुंबई विद्यापीठाचे रासेयोचे समन्वयक बाबासाहेब बिडवे, रासेयोचे विभाग समन्वयक प्रा. विवेक कुडू, वनविभाग अधिकारी अमोल पिंपळे, विश्रामपूर गावाचे सरपंच संतोष तर यांनी शिबिराला भेटी दिल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार