शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

खैरांची तस्करी रोखण्याचे आव्हान;वाहनचालक, मालक, तस्कर जातात निसटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:35 IST

या तालुक्यात गेल्या वर्षभरापासून खैरांची कात काढून विक्र ी करणारी टोळी सक्रिय आहे. कात काढलेल्या खैरांलो चांगला भाव मिळत असल्याने, वनविभागाची नजर चुकवून त्याच्या विक्रीचा विक्रीचा धंदा तेजीत आहे.

- हुसेन मेमनजव्हार : या तालुक्यात गेल्या वर्षभरापासून खैरांची कात काढून विक्र ी करणारी टोळी सक्रिय आहे. कात काढलेल्या खैरांलो चांगला भाव मिळत असल्याने, वनविभागाची नजर चुकवून त्याच्या विक्रीचा विक्रीचा धंदा तेजीत आहे. या टोळीची पाळेमुळे खणून काढणे हे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे.या टोळीमुळे दिवसेंदिवस जंगल उध्वस्त होतांना दिसत आहे. जव्हार वनविभागाने या टोळीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून, त्यांची दिवसरात्र गस्त या परिसरात तैनात केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.या तालुक्यात उत्तर व दक्षिण असे दोन वनविभाग आहेत. या जंगल परिसरातील वनप्लॉट, एकसाली प्लॉट, मालकी हक्क या क्षेत्रातील खौरांची तोड करून राजरोसपणे विक्र ी केली जात आहे.या तालुक्यातील दसकोड, पळशीन, वावर वांगणी, रु ईघर बोपदरी, झाप हेदोली, पिंपळशेत खरोंडा, घिवंडा, या भागात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिक आहे. त्यातच गेल्या वर्षी देखील खैरांची तस्करी करणारे टेम्पो, ट्रक, पकडण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र नेहमीप्रमाणे वाहन आणि मुददेमाल हाती आला पण चालक व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन अथवा गुंगारा देऊन पळून गेले असे नेहमीप्रमाणे घडते आहे. त्यामुळे त्या मुद्देमालाचा उपयोग होत नाही. दसकोड, पळशीन भागात वनविभागाने खैरांची साल काढलेला माल जप्त केला पण तो बेवारस दाखवून जव्हारच्या डेपोत जमा करण्यात आला आहे.ग्रामपंचायत दसकोड पैकी पळशीन या वनविभागाच्या जंगल वनक्षेत्रात खैरांची साल काढलेले ओंडके सापडले आहेत. ते नदी, नाला, जंगल झुडुपात लपविलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच खैरांची साल काढलेल्या ओंडक्यापासून गुटक्यासाठी लागणारा काथ बनविला जात असल्याने, मार्केटमध्ये त्याची ४० ते ५० रुपये किलोने विक्र ी होते. त्यामुळे या खैरांच्या तस्करीत या टोळयांना अमाप पैसा मिळत आहे. साल काढलेला खैरांचे ओंडके सिल्वासा, वापी, या ठिकाणी जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वनविभाग या टोळयांना गजाआड करण्याच्या प्रयत्नात आहे.जंगलतोड आणि खैर तोड करणा-या टोळीला वनविभागाने पकडून त्याला मोठी शिक्षा करावी म्हणजे त्यामुळे जंगले व वने वाचतील.- रतन बुधरमाकपा, राज्य सेक्रेटरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार