शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

भाजपापुढे जागा राखण्याचे आव्हान; विकासाची पाटी कोरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:50 IST

तीन विधानसभा मतदारसंघांत तालुका विभागल्याने झाले दुर्लक्ष

- वसंत भोईरवाडा तालुका दोन लोकसभा तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेल्याने तालुक्याला दोन खासदार, तीन आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकून दोन खासदार विजयी केले. तर भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचे आमदार निवडून दिले. मात्र, दोन खासदार तीन आमदारांचा हा तालुका पोरका असून त्याला कोणीही वाली नसल्याने तालुक्याची विकासाची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे भाजपावर तालुक्यातील मतदारांचा नाराजीचा सूर असून आगामी निवडणुकीत त्याचा फटका दोन्ही खासदारांना बसेल असे चित्र दिसत आहे.तालुक्यात एकूण ८६ ग्रामपंचायती असून १६५ गावे व दोनशेहून अधिक पाडे समाविष्ट आहेत. त्यातील भिवंडी लोकसभेत ११९ मतदान केंद्राचा समावेश आहे. पालघर लोकसभेत ४६ मतदान केंद्र समाविष्ट आहेत. आगामी निवडणुकीत २०१४ च्या निवडणुकी सारखी मोदी लाट नसल्याने चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत वाडा तालुक्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर वर्षभरापूर्वी वनगांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे खासदार राजेंद्र गावित हे विजयी झाले असले तरी या भागातील विकास कामे करण्यात त्यांनाही अपयश आले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत वाड्याच्या मतदारांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या शांताराम मोरे , विक्र मगड विधानसभेत विष्णू सवरा व शहापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या पारड्यामध्ये मत टाकून तीन वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांना निवडून दिले होते.२०१४ च्या भिवंडी ग्रामीण लोकसभेच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा १,०९,४५१ लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या एका तुल्यबळ नेत्याला उमेदवारी देणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाल्याने भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.समस्या आणि अपेक्षांचे ओझेतालुक्यातील सिंचन व्यवस्थेकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी वर्ग नाराज असून कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात सुद्धा त्यांना अपयश आले आहे. कृषी वर आधारित उद्योगधंद्यांना चालना देण्यात अपयश आले आहे.वाडा-भिवंडी महामार्गाची दुरावस्था रस्त्यावरील अपघातात शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच, तालुक्यातील उद्योगधंदे स्थलांतरित व रोजगाराचा प्रश्न गंभीर आहेत.दृष्टिक्षेपात राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात पसरलेली लाट आता ओसरली असल्याने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत होणार आहे. भाजपाने शिवसेनेसोबतकेलेला संघर्ष आज युती झाली असली तरी त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कडवी झुंज झाली यात शिवसेनेने भाजपाला अस्मान दाखवले होते. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला हरवत काँग्रेसने मिळवलेला मोठा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला होतावाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पालकमंत्र्यांच्या कन्येला पाडून वाड्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते. वाडा पंचायत समितीत भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेची फळे चालल्याने शिवसैनिकात चांगलाच रोष आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघर