शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जन्म-मृत्यूचे दाखले मिळणे आव्हानच, तहसीलदारांना पुन्हा अधिकार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:00 IST

ग्रामीण भागातील जन्म-मृत्यूच्या नोंदीना जर उशिर झाल्यास येथील गोरगरीबांना सध्या न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील आदीवासी बांधवाना हा आदेश ‘सुल्तानी’ वाटत आहे.

विक्रमगड : ग्रामिण भागातील जन्म-मृत्यूच्या नोंदीना जर उशिर झाल्यास येथील गोरगरीबांना सध्या न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील आदीवासी बांधवाना हा आदेश ‘सुल्तानी’ वाटत आहे. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्यांना अशिक्षितांना तालुक्याच्या ठिकाणी अर्जफाटे करुन वकील नोटरीच्या पायरीवर नाक घासावे लागत आहे. येथे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. शेती हंगाम सोडला तर मजुरी शिवाय अन्य पर्याय नाही़ या चक्रामुळे मजुरीतुनच घरखर्च चालवावा लागत असल्याने शिक्षण नाही या अज्ञानामुळे वेळचेवेळी जन्म-मृत्यु नोंदणी केली जात नाही़ पूर्वी वेळेवर जन्म नोंदणी केली नसल्यास तहसिलदार कार्यालयाकडे उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी करण्याकरीता प्रकरण सादर केले जात होते. तसेच, ग्रामपंचायतीला आदेश देवून ग्रामपंचायत त्याप्रमाणे जन्म मृत्यू दाखला देत होते. फुकटात होणारे हे काम आता येथील गरीब आदिवासी अज्ञानी जनतेला उच्चन्यायालयाच्या डिसेंबर २०१३ च्या एका आदेशानुसार राज्य शासनाने परिपत्रकामुळे भुर्दंड ठरत आहे. कारण आता हेच आदेश न्यायालयामार्फत करण्यात आल्याने व विक्रमगड येथे न्यायालय नसल्याने जव्हार किंवा वाडा या ठिकाणी जावे लागले. आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामाचा खाडा व होणारा खर्च त्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे हे आदेश तहसिलदारां मार्फत व्हावेत अशी एकमुखील मागणी पंचक्रोशीतून होत आहे़ जन्म-मृत्यूची नोंदणी ही आवश्यक बाब असल्याने यासाठी सरकारने टीव्ही, वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे जनजागृती केली़ तरीही या नोंदणीसाठी टाळाटाळ केली जाते़ काही लोक तर गरजेच्या वेळी जन्म-मृत्युंची नोंदणी करायला धावतात. 

पूर्वी होती पाच वर्षांची मुभा २०१३ पासून या नियमात बदलजन्म-मृत्युची नोंदणी आवश्यक असुन अनेक ठिकाणी जन्म-मृत्यू दाखला महत्वाचा दस्तावेज समजला जातो़ मात्र काही लोक गरज लागल्यानंतर हे दाखले मिळविण्यासाठी धावपळ करतात. शाळा प्रवेशाच्या वेळी हे दाखले काढणाºया पालकांचे प्रमाण तर अधिक आहे़ तसेच, मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या वेळी संबंधीत व्यक्तींच्या मृत्यूच्या दाखल्याची आठवण येते़ आतापर्यत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेन पाच वर्षापर्यंत नोंदणीची मुभा होती.

पाच वर्षामध्ये जन्म-मृत्युंचे प्रमाणपत्र घेता येत होते़. तर त्यानंंतर तहसिलदारासमोर केलेले प्रकरणानुसार दिलेल्या आदेशानुसार संबंंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सादर केल्यानंतर जन्म-मृत्यु दाखला मिळवता येत होता़ मात्र, आता अशा प्रकारे जन्म-मृत्युचा दाखला मिळवता येत नसून डिसेंबर २०१३ पासून या नियमात बदल करत जन्म-मृत्युनंतर पहिल्या ३० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेत जन्म-मृत्युचे दाखले मिळणार आहे़ हा नियम बनला आहे.

त्यानंतर येणाऱ्यांनी सत्यप्रतिज्ञापत्राद्वारे दाखले मिळावावे लागतील़ परंतु याचा कालावधी केवळ एक वर्षाचाच आहे़ त्यानंतर येणाºयांना मात्र, न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे़ एक वर्षानंतर संबंधित जन्म-मृत्युची नोंदणी करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयां समोर अर्ज करावा लागतो़ या अर्जावर सुनावणी झाल्यानंतरच कोर्टाच्या आदेशानंतर दाखले मिळत आहेत़ याबाबचे सरकारने परिपत्रक स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवले जाते व दाखल्याची पुर्तता होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार