शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

योग्य उमेदवार निवडण्याचे सर्वच पक्षश्रेष्ठींपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:11 IST

अर्ज भरण्यासाठी उरले अवघे ३ दिवस : मुलाखती आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रि येला वेग

पंकज राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण ३४ गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ४ दिवस उरले असल्याने उमेदवारांच्या मुलाखती आणि उमेदवार निश्चित करणे या प्रक्रियेला वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असून इच्छुकांच्या गर्दीने पक्ष कार्यालये फुललेली दिसत आहेत, तर सक्षम व योग्य उमेदवार निवडीचे आव्हान सर्वच पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाले आहे.

पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून सलग दोन दशके सेनेची सत्ता पालघर पंचायत समितीवर आहे. तालुक्याच्या शहरी व सागरी भागावर सेनेची चांगली तर बहुजन विकास आघाडीची डोंगरी भागावर बऱ्यापैकी पकड आहे. या निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान सदस्यांच्या गणावरील नव्याने पडलेल्या आरक्षणामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आता त्यांच्याच पक्षातील उमेदवारांचा प्रचार करून निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीनंतर पालघर पंचायत समितीच्या ३४ गणांसाठी २८ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष व संघटनांमध्ये युती व आघाडी झाली नव्हती. सर्व प्रमुख पक्ष आणि संघटनांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यापैकी १९ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजप २४ पैकी ४, काँग्रेस १७ पैकी ०, राष्ट्रवादी काँग्रेस ७ पैकी ०, तर बहुजन विकास आघाडीने २८ उमेदवार उभे करून १० उमेदवारांना निवडून आणले होते, तर १ अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता बदललेल्या समीकरणात कोणत्या पक्षाला फायदा होईल, याचीही चर्चा रंगू लागली आहे.राज्यातील समीकरणाची पुनरावृत्ती जिल्ह्यातही?अनपेक्षित जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे सर्वच पक्ष, संघटना तसेच इच्छुक उमेदवारांची प्रचंड धावपळ सुरू असून या घडीला फक्त उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यात शिवसेना-भाजपची मागील २५ वर्षांपासूनची युती तुटून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी राज्याच्या सत्तेत आली असून आता तशीच आघाडी राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील सत्तासमीकरणाची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यातही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २३ डिसेंबर असून ७ जानेवारीला निवडणूक असल्याने हा अवधी खूपच कमी आहे. त्यामुळे आघाडी व अंतिम उमेदवारांबाबत निर्णय जलद गतीने घ्यावा लागणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने १७ डिसेंबरमध्ये दिलेल्या सूचनांनुसार व अधिनियमातील तरतुदीनुसार पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय निर्वाचन गणाचे नाव नामनिर्देशन पत्र सादर करणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, नामनिर्देशन पत्र सादर करण्याची व त्याची छाननी करण्याचे ठिकाण मतदान व मतमोजणीची तारीख, वेळ व मतमोजणीचे ठिकाण याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सोमवार २३ डिसेंबर ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची शेवटची तारीख असून निवडणूक मंगळवार दि. ७ जानेवारी २०२० रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची अक्षरश: धांदल उडाली आहे.