शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

वाढवण बंदराबाबत केंद्र सरकार बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:57 IST

बंदरविरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला यश

हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध आणि त्यासाठी वाढवण संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटना देत असलेली कायदेशीर लढाई यामुळे केंद्र शासन बॅकफूटवर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या  प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदविल्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करून आपले आदेश मागे घेतल्याची माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे नरेंद्र नाईक यांनी दिली.वाढवण बंदर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने चंग बांधला आहे. असाच एक प्रयत्न करताना केंद्र सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश यांच्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करीत वाढवण बंदर विरोधी संघर्षातील हवा काढून वाढवण बंदर उभारणीबाबत मनाजोगते निर्णय घेणे सोपे जाईल, असा डाव  असल्याचे संघर्ष समितीने जाणले होते. ही चाल संघर्ष समिती व मच्छीमार संघटनांनी आधीच ओळखली आणि या नियुक्तीस मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका सध्या प्रलंबित आहे. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले होते की, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण स्थापन करावे. हे आदेश लक्षात घेऊन सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण प्रथम स्थापन करून उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. 

सरकारने सुमारे दोन वर्षे नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली नाही. मात्र, २७ ऑक्टोबर २०२० रोजी शासनाने एक आदेश निर्गमित करून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याचे अतिरिक्त मुख्य किंवा प्रधान सचिव नगर विकास खाते यांची नियुक्ती करण्याची तरतूद केली होती. या बदलाविरोधात समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  सुनावणीवेळी समितीच्या वकिलांनी या फेरबदलास विरोध दर्शवला. 

टॅग्स :palgharपालघरGovernmentसरकार