शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

वाढवण बंदराबाबत केंद्र सरकार बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:57 IST

बंदरविरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला यश

हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध आणि त्यासाठी वाढवण संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटना देत असलेली कायदेशीर लढाई यामुळे केंद्र शासन बॅकफूटवर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या  प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदविल्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करून आपले आदेश मागे घेतल्याची माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे नरेंद्र नाईक यांनी दिली.वाढवण बंदर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने चंग बांधला आहे. असाच एक प्रयत्न करताना केंद्र सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश यांच्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करीत वाढवण बंदर विरोधी संघर्षातील हवा काढून वाढवण बंदर उभारणीबाबत मनाजोगते निर्णय घेणे सोपे जाईल, असा डाव  असल्याचे संघर्ष समितीने जाणले होते. ही चाल संघर्ष समिती व मच्छीमार संघटनांनी आधीच ओळखली आणि या नियुक्तीस मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका सध्या प्रलंबित आहे. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले होते की, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण स्थापन करावे. हे आदेश लक्षात घेऊन सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण प्रथम स्थापन करून उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. 

सरकारने सुमारे दोन वर्षे नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली नाही. मात्र, २७ ऑक्टोबर २०२० रोजी शासनाने एक आदेश निर्गमित करून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याचे अतिरिक्त मुख्य किंवा प्रधान सचिव नगर विकास खाते यांची नियुक्ती करण्याची तरतूद केली होती. या बदलाविरोधात समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  सुनावणीवेळी समितीच्या वकिलांनी या फेरबदलास विरोध दर्शवला. 

टॅग्स :palgharपालघरGovernmentसरकार