शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:06 IST

यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी दिल्या पर्यटनस्थळाला भेटी

हितेन नाईकपालघर : ‘क्यार’ चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळासोबतच जिल्ह्यात एकावर एक बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर बसत असून यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी केळवे तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्याने या व्यवसायाचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. पर्यटकांच्या मनात वाढत चाललेली ही भीती भविष्यात पर्यटन व्यवसायाला मारक ठरू शकते.

जिल्ह्याला ११० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून रेल्वेची साखळी, चांगले रस्ते अशी उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय, उत्तम पर्यटन स्थळे आणि प्रदूषणविरहीत समुद्र किनारे असल्याने दरवर्षी पालघर जिल्ह्यातील झाई, बोर्डी, डहाणू, केळवे, जव्हार, अर्नाळा आदी भागात मुंबई, गुजरात राज्यातील हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. जिल्हा प्रशासन पातळीवरूनही येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

नवरात्रोत्सव संपला की कॉर्पोरेट कंपन्यांचे ग्रुप, महिला मंडळे, पुरूष ग्रुप यांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे वळतात. तर दिवाळी संपली की आपल्या मुलाबाळांसह शेकडो कुटुंबे केळवे, अर्नाळा, कळंब, डहाणू-बोर्डी आदी भागाला भेट देत असतात.अरबी समुद्रांतर्गत अचानक झालेल्या बदलांचा मोठा फटका या वर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्र वारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेगही वाढला असून किनाºयावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत समुद्राचे पाणी गावातील घरात शिरू लागले आहे.

तर डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने पंचविशी गाठली असून मागच्या आठवड्यापर्यंत हे धक्के सुरूच आहेत. ४.८ रिष्टर स्केलपर्यंत या भूकंपाने मजल गाठल्याने याचा धसका पर्यटकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे एके ठिकाणी कधीही बसणारे भूकंपाचे धक्के, अवेळी कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे क्यार आणि महा चक्रीवादळाच्या तडाख्याची भीती पर्यटकांना सतावत आहे. मुंबई, नाशिक, वापी, सुरत आदी भागातील पर्यटक अशा धोकादायक बनू पाहणाºया वातावरणाची चौकशी करून येण्याचे टाळत असल्याचे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पर्यटकांच्या मनातील भीती दूर सारीत त्यांना विश्वास वाटेल, यासाठी सोयीसुविधा उभारायला हव्यात, अशी मागणी होत आहे.केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन : जिल्ह्यात हळुहळू कमी होत चाललेला पर्यटन व्यवसाय टिकून रहात पर्यटकांनी अधिकाधिक या भागातील पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून केळवे येथे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ताजे पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबील, उकड हंडी आदी खाद्य पदार्थांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आल्याचे कार्यवाह संजय घरत यांनी सांगितले.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ