शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:06 IST

यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी दिल्या पर्यटनस्थळाला भेटी

हितेन नाईकपालघर : ‘क्यार’ चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळासोबतच जिल्ह्यात एकावर एक बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर बसत असून यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी केळवे तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्याने या व्यवसायाचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. पर्यटकांच्या मनात वाढत चाललेली ही भीती भविष्यात पर्यटन व्यवसायाला मारक ठरू शकते.

जिल्ह्याला ११० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून रेल्वेची साखळी, चांगले रस्ते अशी उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय, उत्तम पर्यटन स्थळे आणि प्रदूषणविरहीत समुद्र किनारे असल्याने दरवर्षी पालघर जिल्ह्यातील झाई, बोर्डी, डहाणू, केळवे, जव्हार, अर्नाळा आदी भागात मुंबई, गुजरात राज्यातील हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. जिल्हा प्रशासन पातळीवरूनही येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

नवरात्रोत्सव संपला की कॉर्पोरेट कंपन्यांचे ग्रुप, महिला मंडळे, पुरूष ग्रुप यांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे वळतात. तर दिवाळी संपली की आपल्या मुलाबाळांसह शेकडो कुटुंबे केळवे, अर्नाळा, कळंब, डहाणू-बोर्डी आदी भागाला भेट देत असतात.अरबी समुद्रांतर्गत अचानक झालेल्या बदलांचा मोठा फटका या वर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्र वारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेगही वाढला असून किनाºयावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत समुद्राचे पाणी गावातील घरात शिरू लागले आहे.

तर डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने पंचविशी गाठली असून मागच्या आठवड्यापर्यंत हे धक्के सुरूच आहेत. ४.८ रिष्टर स्केलपर्यंत या भूकंपाने मजल गाठल्याने याचा धसका पर्यटकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे एके ठिकाणी कधीही बसणारे भूकंपाचे धक्के, अवेळी कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे क्यार आणि महा चक्रीवादळाच्या तडाख्याची भीती पर्यटकांना सतावत आहे. मुंबई, नाशिक, वापी, सुरत आदी भागातील पर्यटक अशा धोकादायक बनू पाहणाºया वातावरणाची चौकशी करून येण्याचे टाळत असल्याचे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पर्यटकांच्या मनातील भीती दूर सारीत त्यांना विश्वास वाटेल, यासाठी सोयीसुविधा उभारायला हव्यात, अशी मागणी होत आहे.केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन : जिल्ह्यात हळुहळू कमी होत चाललेला पर्यटन व्यवसाय टिकून रहात पर्यटकांनी अधिकाधिक या भागातील पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून केळवे येथे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ताजे पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबील, उकड हंडी आदी खाद्य पदार्थांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आल्याचे कार्यवाह संजय घरत यांनी सांगितले.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ