शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
3
"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
4
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
5
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
6
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
7
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
8
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
9
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
10
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
11
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
12
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
13
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
14
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
15
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
16
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
17
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
18
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
19
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
20
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

उमेदवारांची तारांबळ

By admin | Updated: March 26, 2016 02:41 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून आलेल्या उमेदवारांचे अर्ज दिवसभरात बनवून दिले जात नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. जि. प. सदस्य प्रकाश निकम यांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने वाढीव मनुष्य बळाची सोय केल्यानंतर अनेक प्रकरणे मार्गी लागली.पालघर जिल्ह्यातील एकूण ४७० ग्रामपंचायती पैकी ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर मधून (५६), वाड्यातुन (७०), वसईतुन (११), डहाणूतून (६२), तलासरी (१२), विक्रमगड (३६), जव्हार (४७), व मोखाडा (२१), अशा तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने त्यातील शंभर टक्के जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे निवडणुक लढवायची असेल तर उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधीत उमेदवाराला आपल्या अर्जासोबत जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक ठरणार आहे. त्यासाठी संबंधीत तहसिलदाराकडून कागदपत्रे तपासणी करून आणल्यानंतर तसे नाहरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाते. त्यासाठी मागील आठवडाभरापासून विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी इ. ग्रामीण भागातून हजारो इच्छुक उमेदवार आपल्या गावातून पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या फाईली जमा करून ठाण मांडून बसले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छुक उमेदवारांना संध्याकाळपर्यंत पत्र मिळत नव्हते. त्यामुळे पहाटे आपल्या गावाहुन बस पकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पत्र मिळत नसल्याने माघारी घरी परत जाण्यासाठी एस.टी बस नसल्याने अनेकांची कुचंबना होणार होती. (प्रतिनिधी)