शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची तारांबळ

By admin | Updated: March 26, 2016 02:41 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून आलेल्या उमेदवारांचे अर्ज दिवसभरात बनवून दिले जात नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. जि. प. सदस्य प्रकाश निकम यांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने वाढीव मनुष्य बळाची सोय केल्यानंतर अनेक प्रकरणे मार्गी लागली.पालघर जिल्ह्यातील एकूण ४७० ग्रामपंचायती पैकी ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर मधून (५६), वाड्यातुन (७०), वसईतुन (११), डहाणूतून (६२), तलासरी (१२), विक्रमगड (३६), जव्हार (४७), व मोखाडा (२१), अशा तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने त्यातील शंभर टक्के जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे निवडणुक लढवायची असेल तर उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधीत उमेदवाराला आपल्या अर्जासोबत जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक ठरणार आहे. त्यासाठी संबंधीत तहसिलदाराकडून कागदपत्रे तपासणी करून आणल्यानंतर तसे नाहरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाते. त्यासाठी मागील आठवडाभरापासून विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी इ. ग्रामीण भागातून हजारो इच्छुक उमेदवार आपल्या गावातून पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या फाईली जमा करून ठाण मांडून बसले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छुक उमेदवारांना संध्याकाळपर्यंत पत्र मिळत नव्हते. त्यामुळे पहाटे आपल्या गावाहुन बस पकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पत्र मिळत नसल्याने माघारी घरी परत जाण्यासाठी एस.टी बस नसल्याने अनेकांची कुचंबना होणार होती. (प्रतिनिधी)