शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

‘त्या’ प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करा, गुन्हे दाखल होत असल्याने ग्रामस्थ एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:26 IST

खारटन जमिनीवर १९९०-९२ सालापासून मोठे कोलंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे.

पालघर : सफाळे येथील जलसार व परिसरातील एक हजाराहून अधिक क्षेत्रावर पसरलेल्या पंचम कोळंबी प्रकल्पासह अन्य भाडेपट्टा संपुष्टात येत असलेल्या प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करावेत, अशी मागणी आगरी सेना आणि आगरी समाजोन्नती संघाने केली आहे.सफाळेच्या पश्चिमेकडील समुद्रालगतच्या जलसार, खार्डी टेंभी-खोडावे, वेढी, डोंगरे, विलंगी, चिखलपाडा आदी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांचे नातेवाईक आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नचिकेत पाटील, अण्णा पाटील आदी बड्या नेत्यांसह काही स्थानिकांनी शासनाकडून भाडेपट्ट्यावर सुमारे एक ते दीड हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी कोलंबी प्रकल्पासाठी घेतल्या आहेत. या खारटन जमिनीवर १९९०-९२ सालापासून मोठे कोलंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे.या कोलंबी प्रकल्पांना सुरुवातीच्या काळात झालेला विरोध काही कालावधीनंतर शमला होता. त्यानंतर या प्रकल्पांतून कोळंबी चोरी प्रकरणी दरोड्यासारखे खोटे गुन्हे स्थानिकांवर होऊ लागल्याने स्थानिक एकवटले असून लोकप्रतिनिधीं-विरोधातील वातावरण तापू लागले आहे.सफाळे परिसरातील भागात भाडेतत्त्वावर दिलेल्या या कोळंबी प्रकल्पांना नऊ ग्रामपंचायतीनी ना हरकत दाखले दिले नसताना राजकीय दबाव निर्माण करून हे कोळंबी प्रकल्प उभे करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या सर्व प्रकल्पांविरोधात आगरी सेना तसेच आगरी समाजाचे संघ, आदिवासी एकता विचार मंच एकवटले असून या प्रकल्पांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करू नये, यासाठी २५ हजार ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवली असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत असल्याचे आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले.स्थानिकांनी अनेक वर्षांपासून सुरक्षित ठेवलेल्या जमिनी राजकीय फायदा उचलीत धनदांडग्यांना वाटप करण्यात आल्या असून रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेकारीत दिवस काढणाऱ्या या भागातील शेकडो तरुणांना आणि महिला बचत गटांना या जमिनींचे वाटप झाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे भाजपचे पदाधिकारी स्वप्निल किणी यांनी सांगितले.चांगले मत्स्य सहकार क्षेत्र उभे राहू शक तेशासनाने या जमिनीच्या दिलेल्या भाडेपट्टा कराराची मुदत आॅगस्ट २०२१ मध्ये संपत असल्याने पुन्हा या जमिनीच्या भाडेपट्टा कराराचे नूतनीकरण न करता या जमिनी खालसा कराव्यात, अशी मागणी आगरी सेनेचे अध्यक्ष दामोदर पाटील यांनी केली आहे.यासंदर्भात पंचम प्रकल्पाचे मालक अजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आजूबाजूला शेकडो शासकीय जमिनी पडून असताना त्याची मागणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून उपलब्ध जमिनीतून चांगले मत्स्य सहकार क्षेत्र उभे राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर