शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘त्या’ प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करा, गुन्हे दाखल होत असल्याने ग्रामस्थ एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:26 IST

खारटन जमिनीवर १९९०-९२ सालापासून मोठे कोलंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे.

पालघर : सफाळे येथील जलसार व परिसरातील एक हजाराहून अधिक क्षेत्रावर पसरलेल्या पंचम कोळंबी प्रकल्पासह अन्य भाडेपट्टा संपुष्टात येत असलेल्या प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करावेत, अशी मागणी आगरी सेना आणि आगरी समाजोन्नती संघाने केली आहे.सफाळेच्या पश्चिमेकडील समुद्रालगतच्या जलसार, खार्डी टेंभी-खोडावे, वेढी, डोंगरे, विलंगी, चिखलपाडा आदी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांचे नातेवाईक आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नचिकेत पाटील, अण्णा पाटील आदी बड्या नेत्यांसह काही स्थानिकांनी शासनाकडून भाडेपट्ट्यावर सुमारे एक ते दीड हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी कोलंबी प्रकल्पासाठी घेतल्या आहेत. या खारटन जमिनीवर १९९०-९२ सालापासून मोठे कोलंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे.या कोलंबी प्रकल्पांना सुरुवातीच्या काळात झालेला विरोध काही कालावधीनंतर शमला होता. त्यानंतर या प्रकल्पांतून कोळंबी चोरी प्रकरणी दरोड्यासारखे खोटे गुन्हे स्थानिकांवर होऊ लागल्याने स्थानिक एकवटले असून लोकप्रतिनिधीं-विरोधातील वातावरण तापू लागले आहे.सफाळे परिसरातील भागात भाडेतत्त्वावर दिलेल्या या कोळंबी प्रकल्पांना नऊ ग्रामपंचायतीनी ना हरकत दाखले दिले नसताना राजकीय दबाव निर्माण करून हे कोळंबी प्रकल्प उभे करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या सर्व प्रकल्पांविरोधात आगरी सेना तसेच आगरी समाजाचे संघ, आदिवासी एकता विचार मंच एकवटले असून या प्रकल्पांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करू नये, यासाठी २५ हजार ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवली असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत असल्याचे आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले.स्थानिकांनी अनेक वर्षांपासून सुरक्षित ठेवलेल्या जमिनी राजकीय फायदा उचलीत धनदांडग्यांना वाटप करण्यात आल्या असून रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेकारीत दिवस काढणाऱ्या या भागातील शेकडो तरुणांना आणि महिला बचत गटांना या जमिनींचे वाटप झाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे भाजपचे पदाधिकारी स्वप्निल किणी यांनी सांगितले.चांगले मत्स्य सहकार क्षेत्र उभे राहू शक तेशासनाने या जमिनीच्या दिलेल्या भाडेपट्टा कराराची मुदत आॅगस्ट २०२१ मध्ये संपत असल्याने पुन्हा या जमिनीच्या भाडेपट्टा कराराचे नूतनीकरण न करता या जमिनी खालसा कराव्यात, अशी मागणी आगरी सेनेचे अध्यक्ष दामोदर पाटील यांनी केली आहे.यासंदर्भात पंचम प्रकल्पाचे मालक अजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आजूबाजूला शेकडो शासकीय जमिनी पडून असताना त्याची मागणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून उपलब्ध जमिनीतून चांगले मत्स्य सहकार क्षेत्र उभे राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर