शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:35 IST

भंगार झालेल्या गाड्या अजूनही रस्त्यावर; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक झाले त्रस्त

-राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम ३० जून व २ जुलैला राबवून एकूण ३२८ पैकी केवळ २१५ बेवारस वाहने जप्त केली. दोन दिवस केलेल्या कारवाईनंतर मोहीम थंडावल्याने ती गुंडाळली का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अद्यापही ठिकठिकाणी भंगारावस्थेत वाहने उभी असून त्यावर कारवाई केव्हा होणार, अशी विचारणा होत आहे.अशा वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव २८ मार्चच्या महासभेत मंजूर झाला होता. या वाहनांचा शोध घेऊन त्यावर नोटीस बजावण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार, १४ ते १९ जूनपर्यंत एकूण ३२८ बेवारस वाहने शोधून त्यांच्यावर नोटिसा लावल्या.ही वाहने उचलण्यासाठी ३० जूनचा मुहूर्त निश्चित केला. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील गोडदेव येथील आरक्षण क्रमांक २१९ वरील नागरी सुविधा भूखंडाची जागा ठरवली.या कारवाईसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रभागानुसार सहा पथके तयार करण्याचे आदेश दिले. पथकाने ३० जून तर २ जुलैला केलेल्या कारवाईत ३२८ पैकी नोटीस शाबूत असलेल्या २१५ वाहनांवरच कारवाई करून ते टोइंग करण्यात आले. त्यासाठी तातडीने भाडेतत्त्वावर टोइंग व्हॅन मागवल्या.या कारवाईनंतरही शहरातील काही भागांत भंगारावस्थेतील वाहने उभी असून त्यावर अद्याप जप्तीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भंगारावस्थेतील वाहनांच्या आसपास घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.पालिकेने एकूण ३२८ वाहनांवर नोटिसा चिकटवल्या होेत्या. त्यातील ११३ वाहने त्यांच्या मालकांनी परस्पर हटवली. उर्वरित २१५ वाहने जप्त केल्यानंतर १५ वाहने त्यांच्या मालकांनी दंड भरून सोडवली. सध्या जप्त २०० वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही शहरात बेवारस वाहने असल्यास त्यावरील कारवाईचा अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.- संजय दोंदे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीपालिकेने बेवारस वाहनांवर सुरू केलेली कारवाई केवळ दिखाऊपणाची ठरली आहे. आजही ठिकठिकाणच्या वाहतूक रस्त्यांजवळ बेवारस व भंगारावस्थेत वाहने उभी आहेत. पालिकेने किमान भंगार झालेल्या वाहनांवर त्यांचे मालकच अस्तित्वात नसल्यामुळे प्राधान्याने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे.- शान पवार,शहर सचिव, मनविसे

टॅग्स :bhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक