शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:35 IST

भंगार झालेल्या गाड्या अजूनही रस्त्यावर; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक झाले त्रस्त

-राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम ३० जून व २ जुलैला राबवून एकूण ३२८ पैकी केवळ २१५ बेवारस वाहने जप्त केली. दोन दिवस केलेल्या कारवाईनंतर मोहीम थंडावल्याने ती गुंडाळली का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अद्यापही ठिकठिकाणी भंगारावस्थेत वाहने उभी असून त्यावर कारवाई केव्हा होणार, अशी विचारणा होत आहे.अशा वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव २८ मार्चच्या महासभेत मंजूर झाला होता. या वाहनांचा शोध घेऊन त्यावर नोटीस बजावण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार, १४ ते १९ जूनपर्यंत एकूण ३२८ बेवारस वाहने शोधून त्यांच्यावर नोटिसा लावल्या.ही वाहने उचलण्यासाठी ३० जूनचा मुहूर्त निश्चित केला. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील गोडदेव येथील आरक्षण क्रमांक २१९ वरील नागरी सुविधा भूखंडाची जागा ठरवली.या कारवाईसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रभागानुसार सहा पथके तयार करण्याचे आदेश दिले. पथकाने ३० जून तर २ जुलैला केलेल्या कारवाईत ३२८ पैकी नोटीस शाबूत असलेल्या २१५ वाहनांवरच कारवाई करून ते टोइंग करण्यात आले. त्यासाठी तातडीने भाडेतत्त्वावर टोइंग व्हॅन मागवल्या.या कारवाईनंतरही शहरातील काही भागांत भंगारावस्थेतील वाहने उभी असून त्यावर अद्याप जप्तीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भंगारावस्थेतील वाहनांच्या आसपास घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.पालिकेने एकूण ३२८ वाहनांवर नोटिसा चिकटवल्या होेत्या. त्यातील ११३ वाहने त्यांच्या मालकांनी परस्पर हटवली. उर्वरित २१५ वाहने जप्त केल्यानंतर १५ वाहने त्यांच्या मालकांनी दंड भरून सोडवली. सध्या जप्त २०० वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही शहरात बेवारस वाहने असल्यास त्यावरील कारवाईचा अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.- संजय दोंदे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीपालिकेने बेवारस वाहनांवर सुरू केलेली कारवाई केवळ दिखाऊपणाची ठरली आहे. आजही ठिकठिकाणच्या वाहतूक रस्त्यांजवळ बेवारस व भंगारावस्थेत वाहने उभी आहेत. पालिकेने किमान भंगार झालेल्या वाहनांवर त्यांचे मालकच अस्तित्वात नसल्यामुळे प्राधान्याने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे.- शान पवार,शहर सचिव, मनविसे

टॅग्स :bhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक