शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

१,८६७ कोटींचा अर्थसंकल्प; अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून शास्ती लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:47 IST

२०१ कोटी रुपयांची शिल्लक असलेला वसई विरार महापालिकेचा १ हजार ८६७ कोटी ३५ लाखाचा सातवा अर्थसंकल्प स्थायी समितीने विशेष महासभेत सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या मालमत्ता कर वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी यावर चर्चा होऊन अर्थसंकल्पाला मंजूरी घेण्यात येणार आहे.

वसई : २०१ कोटी रुपयांची शिल्लक असलेला वसई विरार महापालिकेचा १ हजार ८६७ कोटी ३५ लाखाचा सातवा अर्थसंकल्प स्थायी समितीने विशेष महासभेत सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या मालमत्ता कर वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी यावर चर्चा होऊन अर्थसंकल्पाला मंजूरी घेण्यात येणार आहे.स्थायी समितीचे सभापती अफीफ शेख यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर करून त्याचे वाचन केले. त्यानंतर या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी सात दिवसांची मुदत मागितली. महापौर रुपेश जाधव यांनी येत्या शुक्रवारी विशेष महासभेत त्यावर चर्चा करून मंजूरी घेण्यात येईल, असे जाहिर केले.मालमत्ता कर, अनधिकृत बांधकामावरील मालमत्ता करावर शास्ती, नगररचना विभागाची फी, जाहिरात फी, जागेचे भाडे ही महापालिकेचे उत्तन्नाचे मार्ग आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीवर यंदाच्या बजेटमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरातील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण करून नव्याने क्षेत्रफळानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. तर अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर शास्ती लावली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ता करात वाढ होऊन महापालिकेच्या तिजोरीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर अनधिकृत नळ जोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही अर्थसंकल्पात सुचवण्यात आले आहे.एमएमआरडीएच्या नव्या योजनेतून १८५ एमएलडी पाण्यासह देहरजा आणि सुसरी प्रकल्पातून ४९० एमएलडी मिळून एकूण ६७५ एलएलडी पाणी आगामी काळात वसईकरांना मिळणार असल्याची ग्वाही अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. विरार शहरातील पूर्वेला नारंगी येथील टेकडीवर हँगिंग गार्डनच्या धर्तीनर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. नालासोपाऱ्यातलक्ष्मीबेन छेडा मार्ग, मजेठीया पार्क येथे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तर विरार शहरात गोकुळ टाऊनशिप परिसरातील सांस्कृतिक भवनाचे कामही अंतिम टप्यात असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक सेवेसाठी उड्डाणपूल अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावितवसई विरार शहरातील वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी माणिकपूर शहरातील पंचवटी नाका, नालासोपाºयातील आचोळे चंदननाका, नालासोपारा लक्ष्मीबेन छेडा मार्ग, श्रीप्रस्थ, सेंट्रल पार्क, विरार शहरातील नारंगी नाका, बोळींज, फुलपाडा येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विरार शहरात नारंगी, विराटनगर, नालासोपाºयात ओसवाल नगरी, अलकापुरी, नवघर-माणिकपूर शहरात उमेळमान या ठिकाणी रेल्वेच्या दोन्ही बाजूंना जोडणारे रेल्वे उड्डाणपूल अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार