शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

शाई नदीवरील पूल खचला, रस्त्यांची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 00:05 IST

शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शाई नदीवरील पूल खचल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

शेणवा : शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शाई नदीवरील पूल खचल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. चार ते पाच दिवस होत असलेल्या मुसळधार पावसात तालुक्यातील बेलवली, हुंबाचापाडा, ढाढरे, तोरणपाडा, साखरपाडागाव तसेच इतर आदिवासी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नदीला आलेल्या पाण्याच्या पुरात शाई नदीपात्रावरील पूल खचला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती न केल्यास पूल पूर्णत: खचण्याची शक्यता असून तसे झाल्यास गावपाडे, वाड्यांचा संपर्कतुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.७० वर्षे जुना असलेल्या या पुलाचे आॅडिट जिल्हा परिषदेकडून झालेच नाही. बºयाच वर्षांपासून पुलाचे नूतनीकरण करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला जिल्हा परिषदेकडून केराची टोपली दाखवली जात आहे. नागरिकांना उदरनिर्वाहासाठी तसेच आजूबाजूच्या गावातील मुलांना शिक्षणासाठी पूल ओलांडून जावे लागते. याशिवाय, रात्रीअपरात्री कुणी आजारी पडले तर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे यांच्याशी संपर्कसाधला असता जिल्हा परिषदेला फक्त १५ मीटर काम करण्याची परवानगी असते. पण हा पूल जास्त लांबीचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करायला लागेल, अशी माहिती देण्यात आली.