शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

पुढच्या वेळी जमावबंदी मोडू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:12 IST

भाजपचा इशारा :  दडपशाहीने मोर्चा अडवल्याचा आरोप 

 लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : एकीकडे निष्क्रिय, अविश्वसनीय, बेभरवशाचे असे तिघाडी सरकार काम करीत असून दुसरीकडे लोकांच्या मागण्यांसाठी आयोजित मोर्चा दडपशाहीने थांबविला जातो. या मुस्कटदाबीचा निषेध करीत पुढच्या वेळी जमावबंदी मोडून हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊ, असा इशारा जिल्ह्याचे प्रभारी आ. संजय केळकर यांनी दिला.

जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर आदी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पालघरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत त्यांना ताब्यात घेतले. या वेळी जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्या-रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याला छावणीचे रूप आले होते. पोलिसांच्या कृतीचा भाजपने निषेध नोंदवला आहे. या मोर्चासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, माजी आ. पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, सुशील औसारकर, सुजित पाटील, अशोक वडे, युवाध्यक्ष समीर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याने अनेकांना पोलिसांनी ठाण्यात आणून स्थानबद्ध करून नंतर सोडण्यात आले. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे भाजपने जाहीर केले.

या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने महाआघाडी सरकारवर हल्ला चढवीत राज्यात सरकारच्या अनेक घटक पक्षांकडून मोर्चे काढले जात असताना भाजपचा आजचा पालघरमध्ये आयोजित मोर्चा रद्द करायला लावून तिघाडी सरकारने आम्ही दडपशाहीनेच वागून दाखवू हे स्पष्ट करून दाखविल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. 

 

टॅग्स :BJPभाजपा