शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुढच्या वेळी जमावबंदी मोडू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:12 IST

भाजपचा इशारा :  दडपशाहीने मोर्चा अडवल्याचा आरोप 

 लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : एकीकडे निष्क्रिय, अविश्वसनीय, बेभरवशाचे असे तिघाडी सरकार काम करीत असून दुसरीकडे लोकांच्या मागण्यांसाठी आयोजित मोर्चा दडपशाहीने थांबविला जातो. या मुस्कटदाबीचा निषेध करीत पुढच्या वेळी जमावबंदी मोडून हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊ, असा इशारा जिल्ह्याचे प्रभारी आ. संजय केळकर यांनी दिला.

जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर आदी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पालघरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत त्यांना ताब्यात घेतले. या वेळी जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्या-रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याला छावणीचे रूप आले होते. पोलिसांच्या कृतीचा भाजपने निषेध नोंदवला आहे. या मोर्चासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, माजी आ. पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, सुशील औसारकर, सुजित पाटील, अशोक वडे, युवाध्यक्ष समीर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याने अनेकांना पोलिसांनी ठाण्यात आणून स्थानबद्ध करून नंतर सोडण्यात आले. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे भाजपने जाहीर केले.

या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने महाआघाडी सरकारवर हल्ला चढवीत राज्यात सरकारच्या अनेक घटक पक्षांकडून मोर्चे काढले जात असताना भाजपचा आजचा पालघरमध्ये आयोजित मोर्चा रद्द करायला लावून तिघाडी सरकारने आम्ही दडपशाहीनेच वागून दाखवू हे स्पष्ट करून दाखविल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. 

 

टॅग्स :BJPभाजपा