शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

...तर तमाम मच्छीमारांचा निवडणूकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:28 IST

पालघरला विराट मोर्चा : दोन महिन्यात करा प्रश्नांची निर्णायक सोडवणूक

पालघर : समुद्रातील कवींचे वाढते अतिक्रमण, मासळी मार्केटचा प्रश्न, पर्ससीन ट्रॉलर्स चा धुमाकूळ, कोळी वस्तीचे सीमांकन आदी प्रलंबित प्रश्नांची येत्या दोन महिन्यांच्या आत सोडवणूक न केल्यास पालघर, डहाणू तालुक्यातील संपूर्ण मच्छीमार समाज येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याची घोषणा सोमवारच्या मोर्चात करण्यात आली. ह्यावेळी सरकार विरोधातील आक्रोश आज दिसून आला.

दमण ते दातीवरे मच्छीमार धंदा संरक्षण समिती च्या वतीने उत्तन, वसई, अर्नाळा, मढ, भागातील मच्छीमारांनी समुद्रात सागरी हद्दीत केलेले अतिक्रमण, अवैधरित्या पर्ससीन मासेमारीवर बंदी घालणे, मत्स्यव्यवसाय विभागा कडून देण्यात न आलेला डिझेल परतावा, जिल्ह्यातील मच्छीमारांच्या किनाऱ्या लगतच्या जमिनीचे सीमांकन करून सातबारे मिळावे, मासे विक्री करणाºया महिलांना मार्केट व सुविधा मिळाव्यात आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकाकडे हजारो मच्छीमार, महिला एकत्र जमल्या होत्या. तेथून रेल्वे स्टेशन, हुतात्मा स्तंभ, ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात आला. ह्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. एनएफएफ चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक अंभिरे, उपाध्यक्ष सुभाष तामोरे, राजेंद्र पागधरे, चिटणीस रवींद्र म्हात्रे, कृती समितीचे राजन मेहेर, रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर, प्रवीण दवणे, राजकुमार भाय, रमेश बारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांची भेट घेऊन मत्स्य संवर्धनासाठी आम्ही मे महिन्यातच मासेमारी बंद करून मत्स्य साठ्यांचे संवर्धन करायचे आम्ही आणि ते मासे मात्र बाहेरच्या पर्ससीन ट्रॉलर्सने पकडून न्यायचे हे आता खपवून घेतले जाणार नसल्याचे सुभाष तामोरे ह्यांनी सांगितले. त्यांच्यावर होणाºया कारवाई बाबतचे नियम तकलादू असून कठोर कायदे करा त्यानुसार त्यांच्यावर कारवाई साठी स्पीडबोटी ची गरज व्यक्त केली.ह्यावर बोटी खरेदी साठी स्वतंत्र फंडाची तरतूद असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी सांगितल्यावर त्याचा वापर करा असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पर्ससीन ट्रॉलर्स वर कारवाई साठी पोलीस, महसूल, कोस्टगार्ड, संस्था ह्यांची संयुक्त समिती स्थापन करून जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोलरूम स्थापन करून त्याव्दारे संस्थांना माहिती दिली जाईल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. कडक कारवाई बाबत कायदे बनविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार लोकप्रतिनिधींची मदत घेऊन मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करून त्यांच्याकडून आलेल्या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करू असेही त्यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने समुद्रातील कवींच्या अतिक्र मणा बाबत राज्य सरकारने कायदे बनवावेत असे आदेश १५ वर्षांपूर्वी दिले होते. मात्र ते बनविण्याबाबत राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने प्रस्तावच सादर केला नसल्याने हे कायदे आजही बनविले गेले नसल्याचे शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वसई,उत्तन आदी भागातील एक बोटमालक २०-२० कवी मारत सुटला असून अशा हजारो कवी दमण-जाफराबाद पर्यंत पसरल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. वसई, उत्तन भागातील काही बोटमालकानी कवी मारण्याचा धंदाच सुरू केल्याचे सांगितल्यावर अशा बोटधारकावर कलम १३३ प्रमाणे कडक कारवाई चे आदेश जिल्हाधिकाºयांने दिले.

२५ जानेवारीला उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालघर, डहाणू, वसई, उत्तन आदी भागातील मच्छीमार प्रतिनिधींची बैठक २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. त्यात काही सकारात्मक तोडगा निघाला तर उत्तम नाहीतर जिल्हा दंडाधिकारी म्हणून मला असलेल्या अधिकाराचा कारवाईसाठी वापर मी करेन असेही जिल्हाधिकाºयांनी शिष्टमंडळाला सांगितले.घोडा, वनगा यांना पिटाळलेह्या आंदोलनात कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींना बोलवायचे नाही असे ठरले असताना मोर्चाच्या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी आलेल्या सेनेचे आमदार अमित घोडा आणि लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास वनगा ह्यांना मोर्चेकºयांनी बोलू दिले नाही. 

लोकमत आम्हा मच्छीमारांच्या भावना, समस्या नेहमीच प्रखर पणे मांडत आलेला आहे. सोमवारी आमच्या आंदोलनाच्या आणि आमच्या मनातील व्यथा सडेतोड व निर्भीडपणे मांडल्या बद्दल आम्ही खूपखूप आभारी आहोत.- सुभाष तामोरे, उपाध्यक्ष, धंदा संरक्षण समिती.

टॅग्स :fishermanमच्छीमारShiv Senaशिवसेना