शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा; पालघरमध्ये अतिरिक्त प्रवासी वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 23:06 IST

घोषणा झाली, अंमलबजावणी नाहीच

हितेन नाईक पालघर : तीन तसेच सहा आसनी रिक्षांमधून अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार असून शहरातील सात अधिकृत रिक्षास्टँडवर केवळ पाच रिक्षा ठेवण्याची परवानगी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने पुन्हा एकदा वाहतूक ठप्प होत असल्याचे दिसत असून दुसरीकडे दुकानदारांनी आता पदपथही गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे.जिल्हानिर्मिती नंतर सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पालघर शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था काही सुधारताना दिसत नाही. या बेशिस्त वाहतुकीमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असून नागरिकांना सुरक्षितरित्या चालणे देखील मुश्किल झाले आहे. सकाळपासून रात्री ८.३० वाजेपर्यंत नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो.

जिल्हानिर्मितीनंतरही अतिक्रमण, रस्ते रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण आदी वाहतूक नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाबी गांभीर्याने न घेतल्याने कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्र मणाने रौद्र रूप धारण केले होते. यावर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, राज्यपरिवहन (एसटी) विभाग, विद्युत वितरण, बांधकाम विभाग, रिक्षा - टेम्पो संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन गेल्या महिन्यात पालघर नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.

शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अधिकारी नाईक यांनी वाहतूक आराखड्याबाबत बनवलेला नकाशा या बैठकीत सादर केला होता. यात एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, मच्छीमार्केटचे स्थलांतर, गाड्या पार्र्किंग व्यवस्था यांबाबत उपस्थितांशी चर्चा केली होती. रिक्षाधारकाची संख्या १५०० पर्यंत पोचल्याने या बेछूट तर काही विनापरवाना वाढलेल्या रिक्षाधारकाना आवरण्याची तसदी कुठल्याही विभागाकडून घेतली जात नसल्याने शहरात फक्त सात रिक्षास्टँडवर पाच रिक्षा उभ्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयावर रिक्षाधारकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर यापुढे तीन तसेच सहा आसनी रिक्षांना दिलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त प्रवासी बसण्यास बंदी आणून कारवाईचा बडगा उचलला जाईल असे पालघर पोलिसांनी जाहीर केले होते. मात्र, या वाहतूक कोंडीला काही बेशिस्त रिक्षाधारक कारणीभूत ठरत असल्याने तसेच रिक्षा संघटनांकडून पुरविल्या जाणाऱ्या आर्थिक रसदीमुळे हा कारवाईचा बडगा टिकून रहात नाही, हे अनेक वर्षांपासून दिसले आहे. त्यामुळे निर्णय घेऊन ३६ दिवस उलटून गेल्यानंतरही वाहतूक व्यवस्थेत १ टक्का ही सुधारणा झाल्याचे दिसलेले नाही.रस्त्यारस्त्यावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, फळ - भाजी विक्रेत्यांच्या गाड्या, दुचाकी - चार चाकी गाड्यांचे रस्त्यावरील पार्र्किंग यामुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने त्यांच्या विरोधात सुरू झालेली कारवाई पुन्हा थंडावली आहे. याचा फायदा घेत लोकांना व्यवस्थित चालता यावेम्हणून नगरपालिकेने बनविलेल्या पदपथावर दुकानदारांनी मंडप घालून खाद्यपदार्थांसाठी गॅस, शेगडी पेटवून दुकाने थाटली. खुलेआम लोकांच्या सुरक्षेशी हे दुकानदार जीवघेणा खेळ मांडत असून प्रशासन डोळे मिटून हा तमाशा पाहत असल्याचे दिसून आले होते. यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी