शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अनधिकृत इमल्यांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:29 IST

नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे.

- नारायण जाधवठाणे  - नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. ही नवी बांधकामे तोडून टाकण्याकरिता नोटिसा बजावा व भूमाफियांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने दिले आहेत.ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील सर्वच मोठ्या शहरात तसेच, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, बोईसर, पालघर, तलासरी या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला, तरी त्यानंतरही अनधिकृत बांधकामे थांबताना दिसत नाही. नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केल्याचे प्रकरण ताजे आहे. सरकारच्या नव्या आदेशामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसून त्यामध्ये आपली आयुष्यभराची जमापुंजी खर्चून घर घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.राज्यातील नागरी भागात अनधिकृत इमारतींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भूमाफिया, विकासक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना वारंवार निर्देश देऊनही अशी बांधकामे थांबताना दिसत नाही. पुरेशा परवानग्या न घेताच बांधलेल्या इमारतींत घर, व्यापारी गाळे घेणाºया सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते.त्यांची नोंदणी दुय्यम निबंधकांकडून केली जाते. परंतु, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ज्यावेळी इमारत पाडून टाकण्याबाबत नोटीस दिली जाते, तेव्हा रहिवाशांना ती इमारत अनधिकृत असल्याचे लक्षात येते. अशा इमारतींचे बांधकाम करताना तांत्रिक संरचनेचे नियम पाळले जात नाही. काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा येथे अशाच काही इमारती कोसळून शेकडोंचे जीव गेले, तर नवी मुंबईतील दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर बांधलेल्या ९९ इमारतींचा विषय उच्च न्यायालयात गाजत आहेस्टे आॅर्डरच्या पर्यायाला बसणार आळाही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता नगरविकास विभागाने ३ मे २०१८ रोजी उपरोक्त आदेश नव्याने दिले आहेत. न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याने अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणण्याच्या प्रकारास आळाबसू शकतो.याशिवाय यापूर्वीच्या आदेशांचे पालन करतांना ज्या अधिकाºयांच्या क्षेत्रात ही अनधिकृत बांधकामे होतील, त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.मात्र, संबधित स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी भूमाफियासह विकासकांशी हातमिळवणी करून शासन आदेशांना केराची टोवली दाखवित असल्याने राज्यात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. यापूर्वीही अनेक आदेशांचे पालन झालेले नाही.हे आदेश आहेत कागदावरअनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे, विशेष न्यायालये सुरू करण्याचे तत्कालिन नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे निर्देश अद्यापही कागदावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीराभार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेसह एमएमआरडीए क्षेत्रातील इतर आठ नगरपालिकांच्या क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे आणि विशेष न्यायालय अद्यापही स्थापन झालेले नाही. एमएमआरडीए क्षेत्रातील भिवंडीचा ग्रामीण भाग आणि कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या परिसरात रोज अनधिकृत बांधकामांचे इमलेच्या इमले उभे राहत आहेत. यातील काही बांधकामे तर वन आणि सीआरझेड क्षेत्रात बिनदिक्कत सुरू आहेत.

टॅग्स :thaneठाणेHomeघर