शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अनधिकृत इमल्यांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:29 IST

नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे.

- नारायण जाधवठाणे  - नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. ही नवी बांधकामे तोडून टाकण्याकरिता नोटिसा बजावा व भूमाफियांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने दिले आहेत.ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील सर्वच मोठ्या शहरात तसेच, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, बोईसर, पालघर, तलासरी या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला, तरी त्यानंतरही अनधिकृत बांधकामे थांबताना दिसत नाही. नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केल्याचे प्रकरण ताजे आहे. सरकारच्या नव्या आदेशामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसून त्यामध्ये आपली आयुष्यभराची जमापुंजी खर्चून घर घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.राज्यातील नागरी भागात अनधिकृत इमारतींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भूमाफिया, विकासक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना वारंवार निर्देश देऊनही अशी बांधकामे थांबताना दिसत नाही. पुरेशा परवानग्या न घेताच बांधलेल्या इमारतींत घर, व्यापारी गाळे घेणाºया सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते.त्यांची नोंदणी दुय्यम निबंधकांकडून केली जाते. परंतु, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ज्यावेळी इमारत पाडून टाकण्याबाबत नोटीस दिली जाते, तेव्हा रहिवाशांना ती इमारत अनधिकृत असल्याचे लक्षात येते. अशा इमारतींचे बांधकाम करताना तांत्रिक संरचनेचे नियम पाळले जात नाही. काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा येथे अशाच काही इमारती कोसळून शेकडोंचे जीव गेले, तर नवी मुंबईतील दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर बांधलेल्या ९९ इमारतींचा विषय उच्च न्यायालयात गाजत आहेस्टे आॅर्डरच्या पर्यायाला बसणार आळाही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता नगरविकास विभागाने ३ मे २०१८ रोजी उपरोक्त आदेश नव्याने दिले आहेत. न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याने अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणण्याच्या प्रकारास आळाबसू शकतो.याशिवाय यापूर्वीच्या आदेशांचे पालन करतांना ज्या अधिकाºयांच्या क्षेत्रात ही अनधिकृत बांधकामे होतील, त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.मात्र, संबधित स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी भूमाफियासह विकासकांशी हातमिळवणी करून शासन आदेशांना केराची टोवली दाखवित असल्याने राज्यात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. यापूर्वीही अनेक आदेशांचे पालन झालेले नाही.हे आदेश आहेत कागदावरअनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे, विशेष न्यायालये सुरू करण्याचे तत्कालिन नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे निर्देश अद्यापही कागदावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीराभार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेसह एमएमआरडीए क्षेत्रातील इतर आठ नगरपालिकांच्या क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे आणि विशेष न्यायालय अद्यापही स्थापन झालेले नाही. एमएमआरडीए क्षेत्रातील भिवंडीचा ग्रामीण भाग आणि कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या परिसरात रोज अनधिकृत बांधकामांचे इमलेच्या इमले उभे राहत आहेत. यातील काही बांधकामे तर वन आणि सीआरझेड क्षेत्रात बिनदिक्कत सुरू आहेत.

टॅग्स :thaneठाणेHomeघर