शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भाजपाची गद्दारी सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:24 IST

उद्धव ठाकरे: पालघरमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका

पालघर : भाजपावाले म्हणताहेत बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना उरली नाही माझा त्यांना सवाल आहे भाजपा तरी वाजपेयींच्या काळातली कुठे उरली आहे. त्याकाळी पक्षातील ज्येष्ठांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा मान राखला जायचा. आता तर त्यांना मोडीत काढणारी भाजपा उरली आहे. पैशाचा माज आणि थैली शहा यांच्या तालावर नाचणारी भाजपा बनली आहे. आधी त्याचा विचार करा. बाळासाहेबांनी भाजपाचे अनेक वार, खंजीर सहन केलेत पण मी भाजपाची गद्दारी सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देणार असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथील जाहीर सभेत दिला.या भाजपाला महाराष्टÑात कुणी विचार नव्हते. शिवसेनेचेच बोट धरून युतीचा आधार घेऊन भाजपा येथे काँग्रेस गवतासारखी वाढली आणि आज त्याच शिवसेनेवर ती दुगाण्या झाडते आहे. पहिल्यांदा जेव्हा वाजपेयींचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा ते किती दिवस टिकेल, हे कुणालाच माहिती नव्हते अशा स्थितीत वाजपेयींचा बाळासाहेबांना फोन आला ते म्हणाले प्राप्त परिस्थितीत मी शिवसेनेच्या फक्त एकाच खासदाराला मंत्रीपद देऊ शकतो. त्यासाठी मला नाव सुचवा. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले की आधी तुम्ही पंतप्रधान होणे व तुमचे सरकार स्थिर होते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.शिवसेनेला एकही मंत्रीपद दिला नाही तरी चालेल, इतरांना खूश करण्यासाठी आमच्या कोट्यातील मंत्रीपदे देऊन टाका. असे आम्ही इमानदान आणि युतीधर्म पाळणारे आहोत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या सुरेश प्रभुंना, डॉ. भामरेंना घेतले आम्ही थयथयाट नाही केला.वाढवण बंदर आणि जेएसडब्ल्यू जेट्टी विरोधात येथील संघर्ष समिती ५ जूनला मोर्चा काढणार आहेत. त्यात आमचे हजारो शिवसैनिक सहभागी होती अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणतात जर श्रीनिवास पराभूत झाला तर त्याला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील. परंतु प्रत्यक्षात तो निवडून येणार आणि तुमची खुर्ची जाऊन तुमच्यासाठी दिल्लीचे दरवाजे कायमचे बंद होतील हे विसरू नका, असा टोला त्यांनी हाणला. श्रीनिवास आमच्याकडे आपणहून आला. नुसता नाही सहकुटुंब आला. आम्ही त्याला फोडला नाही. असा दावाही त्यांनी यावेळी केला.तत्परता दाखवली नाहीभाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट करतांना ते म्हणाले, की श्रीनिवासची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी भाजपाने जाहीर केले नाही. आणि काल ते निरंजन डावखरे भाजपात दाखल झाले. त्यांची पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी लगेच दाखल केली. ती निवडणूक आहे २५ जूनला आणि उमेदवारी कधी जाहीर २४ मे ला. जी तत्परता डावखरेंच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत दाखविली ती श्रीनिवासची उमेदवारी घोषित करण्याच्या बाबतीत का दाखविली नाही. ५० वर्षे झाली शिवसेनेत एक पक्ष, एक नेता, एक धोरण, एक निशाणी कायम आहे. परंतु भाजपामध्ये किती बदल झालेत. ते मुख्यमंत्र्यांनी पहावे. आदिवासी असलेला हा एक नवखा युवक त्याला पराभूत करण्यासाठी अख्ख्या सरकारची यंत्रणा राबते आहे. उत्तर प्रदेशातील भाडोत्री नेते प्रचाराला येताहेत. का बरं? तुमच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून का? अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv Senaशिवसेना