शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भाजपाची गद्दारी सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:24 IST

उद्धव ठाकरे: पालघरमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका

पालघर : भाजपावाले म्हणताहेत बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना उरली नाही माझा त्यांना सवाल आहे भाजपा तरी वाजपेयींच्या काळातली कुठे उरली आहे. त्याकाळी पक्षातील ज्येष्ठांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा मान राखला जायचा. आता तर त्यांना मोडीत काढणारी भाजपा उरली आहे. पैशाचा माज आणि थैली शहा यांच्या तालावर नाचणारी भाजपा बनली आहे. आधी त्याचा विचार करा. बाळासाहेबांनी भाजपाचे अनेक वार, खंजीर सहन केलेत पण मी भाजपाची गद्दारी सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देणार असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथील जाहीर सभेत दिला.या भाजपाला महाराष्टÑात कुणी विचार नव्हते. शिवसेनेचेच बोट धरून युतीचा आधार घेऊन भाजपा येथे काँग्रेस गवतासारखी वाढली आणि आज त्याच शिवसेनेवर ती दुगाण्या झाडते आहे. पहिल्यांदा जेव्हा वाजपेयींचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा ते किती दिवस टिकेल, हे कुणालाच माहिती नव्हते अशा स्थितीत वाजपेयींचा बाळासाहेबांना फोन आला ते म्हणाले प्राप्त परिस्थितीत मी शिवसेनेच्या फक्त एकाच खासदाराला मंत्रीपद देऊ शकतो. त्यासाठी मला नाव सुचवा. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले की आधी तुम्ही पंतप्रधान होणे व तुमचे सरकार स्थिर होते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.शिवसेनेला एकही मंत्रीपद दिला नाही तरी चालेल, इतरांना खूश करण्यासाठी आमच्या कोट्यातील मंत्रीपदे देऊन टाका. असे आम्ही इमानदान आणि युतीधर्म पाळणारे आहोत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या सुरेश प्रभुंना, डॉ. भामरेंना घेतले आम्ही थयथयाट नाही केला.वाढवण बंदर आणि जेएसडब्ल्यू जेट्टी विरोधात येथील संघर्ष समिती ५ जूनला मोर्चा काढणार आहेत. त्यात आमचे हजारो शिवसैनिक सहभागी होती अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणतात जर श्रीनिवास पराभूत झाला तर त्याला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील. परंतु प्रत्यक्षात तो निवडून येणार आणि तुमची खुर्ची जाऊन तुमच्यासाठी दिल्लीचे दरवाजे कायमचे बंद होतील हे विसरू नका, असा टोला त्यांनी हाणला. श्रीनिवास आमच्याकडे आपणहून आला. नुसता नाही सहकुटुंब आला. आम्ही त्याला फोडला नाही. असा दावाही त्यांनी यावेळी केला.तत्परता दाखवली नाहीभाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट करतांना ते म्हणाले, की श्रीनिवासची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी भाजपाने जाहीर केले नाही. आणि काल ते निरंजन डावखरे भाजपात दाखल झाले. त्यांची पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी लगेच दाखल केली. ती निवडणूक आहे २५ जूनला आणि उमेदवारी कधी जाहीर २४ मे ला. जी तत्परता डावखरेंच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत दाखविली ती श्रीनिवासची उमेदवारी घोषित करण्याच्या बाबतीत का दाखविली नाही. ५० वर्षे झाली शिवसेनेत एक पक्ष, एक नेता, एक धोरण, एक निशाणी कायम आहे. परंतु भाजपामध्ये किती बदल झालेत. ते मुख्यमंत्र्यांनी पहावे. आदिवासी असलेला हा एक नवखा युवक त्याला पराभूत करण्यासाठी अख्ख्या सरकारची यंत्रणा राबते आहे. उत्तर प्रदेशातील भाडोत्री नेते प्रचाराला येताहेत. का बरं? तुमच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून का? अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv Senaशिवसेना