शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र जिल्हाभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:23 IST

पोटनिवडणूकीतील घाव : मंडळ अध्यक्षांसह १०० पदाधिकाºयांची सोडचिठ्ठी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने चार वेळा जिंकला असून भाजपाचा हा परंपरागत बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यापासून सुरू झालेले राजीनामा सत्र जिल्हाभर पसरले असून १२ मंडळ अध्यक्षासह १०० पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले आहेत.

मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी भाजपाला २५ जागा तर शिवसेनेने २३ जागा असे वाटप झाले असले तरी पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुठेही जाहीर करण्यात आलेले नव्हते. परंतु काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजप-शिवसेनेच्या चर्चेअंती पालघर लोकसभेची जागा सेनेला देण्यात आल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद विक्र मगड तालुक्यात उमटले जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प.स.सभापती मधुकर खुताडे आदींसह अनेक मुख्य पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांना पाठविले होते.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर काही अवधीतच शिवसेनेने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना शिवसेनेने शिवबंधन बांधून पालघर लोकसभेची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपा समोर आव्हान उभे केले होते. मात्र, यात वनगा यांना सहानुभूती पेक्षा भाजपाला मतांच्या रुपाने जनाधार मिळाला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या राजेंद्र गवितांना आपल्याकडे खेचून मुख्यमंत्र्यांनी एक तगडे आव्हान शिवसेने समोर उभे केले होते. अटीतटीच्या या लढाईत गावितांनी यश मिळविले होते. या टक्करीमुळे शिवसेनेने आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे घाव भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आजही विसरलेले नाहीत.एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात भाजपाचे विशेष अस्तित्व नसताना चिंतामण वनगांनी लोकांशी नाळ जोडून हा मतदार संघ भाजपमय केला. त्यामुळे १९८४ पासून भाजपा आतापर्यंत चार वेळा स्वबळावर निवडून आला असून आज जिल्ह्यात भाजपचा १ खासदार, २ आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, २१ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सभापती, ३६ पंचायत समिती सदस्य, २०० सरपंच, १२०० ग्रामपंचायत सदस्य, डहाणू नगरपालिका, ३६ नगरसेवक, एवढी मोठी ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीवर बांधलेला लोकसभेचा मतदार संघ श्रीनिवास वनगांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेला का म्हणून द्यायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी केला आहे.मतदारांना तोंड दाखवायचे कसे?च्खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर नेत श्रीनिवासला लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देत भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा डाव निवडणुकीतील पराभवामुळे फसल्याचे चित्र पुढे आले होते.च्मात्र, आता भाजपला कोंडीत पकडून भाजपची ही परंपरागत जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतल्याची बातमी आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाºयांना मतदारांना सामोरे जाणे मुश्कील होणार आहे.जिल्ह्यातून शेकडो पदाधिकाºयांनी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले असून अजूनही अनेक भागातून राजीनामे माझ्याकडे येत आहेत.- पास्कल धनारे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, पालघर.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार