शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र जिल्हाभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:23 IST

पोटनिवडणूकीतील घाव : मंडळ अध्यक्षांसह १०० पदाधिकाºयांची सोडचिठ्ठी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने चार वेळा जिंकला असून भाजपाचा हा परंपरागत बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यापासून सुरू झालेले राजीनामा सत्र जिल्हाभर पसरले असून १२ मंडळ अध्यक्षासह १०० पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले आहेत.

मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी भाजपाला २५ जागा तर शिवसेनेने २३ जागा असे वाटप झाले असले तरी पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुठेही जाहीर करण्यात आलेले नव्हते. परंतु काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजप-शिवसेनेच्या चर्चेअंती पालघर लोकसभेची जागा सेनेला देण्यात आल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद विक्र मगड तालुक्यात उमटले जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प.स.सभापती मधुकर खुताडे आदींसह अनेक मुख्य पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांना पाठविले होते.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर काही अवधीतच शिवसेनेने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना शिवसेनेने शिवबंधन बांधून पालघर लोकसभेची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपा समोर आव्हान उभे केले होते. मात्र, यात वनगा यांना सहानुभूती पेक्षा भाजपाला मतांच्या रुपाने जनाधार मिळाला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या राजेंद्र गवितांना आपल्याकडे खेचून मुख्यमंत्र्यांनी एक तगडे आव्हान शिवसेने समोर उभे केले होते. अटीतटीच्या या लढाईत गावितांनी यश मिळविले होते. या टक्करीमुळे शिवसेनेने आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे घाव भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आजही विसरलेले नाहीत.एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात भाजपाचे विशेष अस्तित्व नसताना चिंतामण वनगांनी लोकांशी नाळ जोडून हा मतदार संघ भाजपमय केला. त्यामुळे १९८४ पासून भाजपा आतापर्यंत चार वेळा स्वबळावर निवडून आला असून आज जिल्ह्यात भाजपचा १ खासदार, २ आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, २१ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सभापती, ३६ पंचायत समिती सदस्य, २०० सरपंच, १२०० ग्रामपंचायत सदस्य, डहाणू नगरपालिका, ३६ नगरसेवक, एवढी मोठी ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीवर बांधलेला लोकसभेचा मतदार संघ श्रीनिवास वनगांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेला का म्हणून द्यायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी केला आहे.मतदारांना तोंड दाखवायचे कसे?च्खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर नेत श्रीनिवासला लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देत भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा डाव निवडणुकीतील पराभवामुळे फसल्याचे चित्र पुढे आले होते.च्मात्र, आता भाजपला कोंडीत पकडून भाजपची ही परंपरागत जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतल्याची बातमी आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाºयांना मतदारांना सामोरे जाणे मुश्कील होणार आहे.जिल्ह्यातून शेकडो पदाधिकाºयांनी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले असून अजूनही अनेक भागातून राजीनामे माझ्याकडे येत आहेत.- पास्कल धनारे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, पालघर.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार