शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र जिल्हाभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:23 IST

पोटनिवडणूकीतील घाव : मंडळ अध्यक्षांसह १०० पदाधिकाºयांची सोडचिठ्ठी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाºयांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने चार वेळा जिंकला असून भाजपाचा हा परंपरागत बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यापासून सुरू झालेले राजीनामा सत्र जिल्हाभर पसरले असून १२ मंडळ अध्यक्षासह १०० पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले आहेत.

मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी भाजपाला २५ जागा तर शिवसेनेने २३ जागा असे वाटप झाले असले तरी पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कुठेही जाहीर करण्यात आलेले नव्हते. परंतु काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजप-शिवसेनेच्या चर्चेअंती पालघर लोकसभेची जागा सेनेला देण्यात आल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याचे पडसाद विक्र मगड तालुक्यात उमटले जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, प.स.सभापती मधुकर खुताडे आदींसह अनेक मुख्य पदाधिकाºयांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांना पाठविले होते.दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर काही अवधीतच शिवसेनेने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना शिवसेनेने शिवबंधन बांधून पालघर लोकसभेची अधिकृत उमेदवारी देऊन भाजपा समोर आव्हान उभे केले होते. मात्र, यात वनगा यांना सहानुभूती पेक्षा भाजपाला मतांच्या रुपाने जनाधार मिळाला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या राजेंद्र गवितांना आपल्याकडे खेचून मुख्यमंत्र्यांनी एक तगडे आव्हान शिवसेने समोर उभे केले होते. अटीतटीच्या या लढाईत गावितांनी यश मिळविले होते. या टक्करीमुळे शिवसेनेने आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे घाव भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आजही विसरलेले नाहीत.एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात भाजपाचे विशेष अस्तित्व नसताना चिंतामण वनगांनी लोकांशी नाळ जोडून हा मतदार संघ भाजपमय केला. त्यामुळे १९८४ पासून भाजपा आतापर्यंत चार वेळा स्वबळावर निवडून आला असून आज जिल्ह्यात भाजपचा १ खासदार, २ आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, २१ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सभापती, ३६ पंचायत समिती सदस्य, २०० सरपंच, १२०० ग्रामपंचायत सदस्य, डहाणू नगरपालिका, ३६ नगरसेवक, एवढी मोठी ताकद उभी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीवर बांधलेला लोकसभेचा मतदार संघ श्रीनिवास वनगांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेला का म्हणून द्यायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी केला आहे.मतदारांना तोंड दाखवायचे कसे?च्खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर नेत श्रीनिवासला लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देत भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा डाव निवडणुकीतील पराभवामुळे फसल्याचे चित्र पुढे आले होते.च्मात्र, आता भाजपला कोंडीत पकडून भाजपची ही परंपरागत जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतल्याची बातमी आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाºयांना मतदारांना सामोरे जाणे मुश्कील होणार आहे.जिल्ह्यातून शेकडो पदाधिकाºयांनी आपले राजीनामे माझ्याकडे सोपविले असून अजूनही अनेक भागातून राजीनामे माझ्याकडे येत आहेत.- पास्कल धनारे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, पालघर.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार