शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपा जिल्हाध्यक्ष अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:38 IST

वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले

शशी करपे ।वसई : वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले. त्यानंतर दुसºया पत्नीला मयत पत्नीच्या जागी उभे करून उपनिबंधक कार्यालयात एक दस्तऐवजाची नोंदणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने आमदार सुनिल तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडल्याने जिल्हाध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.भाजपाचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी एका गाळ््याची दस्तनोंदणी करण्यासाठी आपली मयत पत्नी सुवर्णा साटम यांच्या जागी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना उभे करून उपनिबंधकांकडे दस्तऐवज नोंदणी केली होती. त्यासाठी साटम यांनी मयत पत्नीला दोन वेळा मृत्यु दाखवून वसई विरार महापालिकेकडून दोन वेळा मृत्युची दाखले काढल्याची खळबळजनक तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी पोलिसांकडे केली होती. यात रामभाऊ म्हाळगी सहकारी पतसंस्थेची आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रारही गुंजाळकर यांनी केली होती.सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा २८ एप्रिल २००३ रोजी मृत्यु झाला होता. त्यानंतर साटम यांनी डॉक्टरांचे मृत्यु प्रमाणपत्र जोडून महापालिकेतून १४ मे २००३ रोजी मृत्यु दाखला घेतला होता. त्यानंतर साटम यांनी सदर गाळ््याची दस्तनोंदणी २००६ रोजी उपनिबंधक कार्यालयात केली होती. त्यावेळी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना मयत पत्नीच्या नावाने उभे करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे सुभाष साटम यांनी पहिली पत्नी १५ आॅक्टोबर २०११ रोजी मयत झाल्याचे मृत्यु प्रमाणपत्र दुसºया एका डॉक्टरकडून घेऊन वसई विरार महापालिकेच्या कार्यालयातून १८ डिसेंबर २०१२ रोजी दुसरा मृत्यु दाखला घेतला होता.भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी आपली पहिली पत्नी दोन वेळा मृत्यु दाखवून दोन वेगवेगळे मृत्यु दाखले घेऊन महापालिकेची फसवणुक केल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. पण, सहा महिन्यात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आमदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. ती शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आली आहे.>पोलिसांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यकराजकीय दबावाखाली कारवाई न करणाºया पोलिसांनी राज्य सरकारला तक्रार गुंजाळकर जबाव देण्यासाठी हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती कळवली आहे.याबाबतीत गुंजाळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.गुंजाळकर यांनी याप्रकरणी महापालिकेची फसवणुक झाल्याने महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बोगस दस्ताऐवज करणाºया बिल्डरांविरोधात महापालिका स्वत: गुन्हा दाखल करते. साटम यांनीही बोगस कागदपत्रे तयार करून महापालिकेची फसवणुक केली आहे.त्यामुळे महापालिकेने साटम यांच्यासह बोगस मृत्यु प्रमाणपत्र देणाºया डॉक्टरांवरही कारवाई करण्याची मागणी गुंजाळकर यांनी केलीआहे. या प्रकरणी वसइ विरार महानगरपालिका प्रशासन काय कायवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.