शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

विक्रमगडात १७, मोखाड्यात ११ जणांची माघार, तलासरीत सगळेच राहिले रिंगणात

By admin | Updated: November 12, 2016 06:19 IST

या नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार

संजय नेवे, विक्रमगडया नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार अशा असंख्य प्रश्नाला आज पूर्ण विराम मिळाला आहे. यामुळे शनिवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे. मतदारांचा गोंधळही कमी होऊन त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार कोण हे कळू शकणार आहे. या निवडणुकीसाठी १०४ उमेदवारांनी े अर्ज दाखल केले होते त्यातील २५ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवल्यानंतर १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते त्यातील १७ जणांनी आज माघार घेतल्याने ६० जण अंतिम लढतीत आहेत. अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली त्याचाच परिणाम होऊन १७ जणांनी माघार घेतली आहे. तरीही सर्वत्र बहुरंगी लढती होणार आहेत. ४९ रिंगणात रविंद्र साळवे, मोखाडा२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नगर पंचायतिच्या १७ प्रभागांमध्ये होणाऱ््या निवडणुकीतून शुक्रवारी ६० पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४९ उमेदवार रिंगणात असून प्रभाग क्रमांक ९ मधील सेना आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे प्रकरण तिसऱ्या अपत्याबाबत न्याय प्रविष्ट आहे. सेना १५ भाजपा, ११ काँग्रेस ५ ,राष्ट्रवादी ६ असे उमेदवार उभे केले आहेत. तसेस बविआ १ , आरपीआय+ मनसे १ उमेदवार उभे आहेत.ठोकले ५८ जणांनी शड्डू, कॉ.राकॉ, सेना स्वबळावर सुरेश काटे, तलासरीतलासरी नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस पण आज कोणीही माघार न घेतल्याने सर्व ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले . भाजपा व माकपा ने सर्व सतरा वार्डात उमेदवार उभे केले असून ते आपल्या ताकदीवर स्वबळावर निवडणूक लढवित आहेत भाजपा व शिवसेनाची युती पण तलासरीत शिवसेनेची ताकद नसल्याने भाजपने शिवसेनेला जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने शिवसेना स्वबळावर लढत आहे शिवसेनेने सात ठिकाणी उमेदवार उभे केले तलासरीत शिवसेना प्रथमच निवडणूक लढवित आहे व उमेदवार उभे केले हे महत्वाचे. तलासरी नगर पंचायती च्या निवडणूक आता चौरंगी होणार असून आज पासून निवडणूक प्रचाराला खरी सुरु वात होणार आहे .अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणुकीचा धुराळा आता उडणार. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना त्यांची राजकीय ताकद काय आहे हेही कळून येणार आहे.