शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडात १७, मोखाड्यात ११ जणांची माघार, तलासरीत सगळेच राहिले रिंगणात

By admin | Updated: November 12, 2016 06:19 IST

या नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार

संजय नेवे, विक्रमगडया नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार अशा असंख्य प्रश्नाला आज पूर्ण विराम मिळाला आहे. यामुळे शनिवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे. मतदारांचा गोंधळही कमी होऊन त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार कोण हे कळू शकणार आहे. या निवडणुकीसाठी १०४ उमेदवारांनी े अर्ज दाखल केले होते त्यातील २५ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवल्यानंतर १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते त्यातील १७ जणांनी आज माघार घेतल्याने ६० जण अंतिम लढतीत आहेत. अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली त्याचाच परिणाम होऊन १७ जणांनी माघार घेतली आहे. तरीही सर्वत्र बहुरंगी लढती होणार आहेत. ४९ रिंगणात रविंद्र साळवे, मोखाडा२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नगर पंचायतिच्या १७ प्रभागांमध्ये होणाऱ््या निवडणुकीतून शुक्रवारी ६० पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४९ उमेदवार रिंगणात असून प्रभाग क्रमांक ९ मधील सेना आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे प्रकरण तिसऱ्या अपत्याबाबत न्याय प्रविष्ट आहे. सेना १५ भाजपा, ११ काँग्रेस ५ ,राष्ट्रवादी ६ असे उमेदवार उभे केले आहेत. तसेस बविआ १ , आरपीआय+ मनसे १ उमेदवार उभे आहेत.ठोकले ५८ जणांनी शड्डू, कॉ.राकॉ, सेना स्वबळावर सुरेश काटे, तलासरीतलासरी नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस पण आज कोणीही माघार न घेतल्याने सर्व ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले . भाजपा व माकपा ने सर्व सतरा वार्डात उमेदवार उभे केले असून ते आपल्या ताकदीवर स्वबळावर निवडणूक लढवित आहेत भाजपा व शिवसेनाची युती पण तलासरीत शिवसेनेची ताकद नसल्याने भाजपने शिवसेनेला जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने शिवसेना स्वबळावर लढत आहे शिवसेनेने सात ठिकाणी उमेदवार उभे केले तलासरीत शिवसेना प्रथमच निवडणूक लढवित आहे व उमेदवार उभे केले हे महत्वाचे. तलासरी नगर पंचायती च्या निवडणूक आता चौरंगी होणार असून आज पासून निवडणूक प्रचाराला खरी सुरु वात होणार आहे .अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणुकीचा धुराळा आता उडणार. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना त्यांची राजकीय ताकद काय आहे हेही कळून येणार आहे.