शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विक्रमगडात १७, मोखाड्यात ११ जणांची माघार, तलासरीत सगळेच राहिले रिंगणात

By admin | Updated: November 12, 2016 06:19 IST

या नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार

संजय नेवे, विक्रमगडया नगर पंचायतीच्या रिंगणातून १७ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता १७ वॉर्डांसाठी ६० उमेदवार उरले आहेत. कोण कुणाशी लढणार किती उमेदवार रिंगणात राहणार अशा असंख्य प्रश्नाला आज पूर्ण विराम मिळाला आहे. यामुळे शनिवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे. मतदारांचा गोंधळही कमी होऊन त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार कोण हे कळू शकणार आहे. या निवडणुकीसाठी १०४ उमेदवारांनी े अर्ज दाखल केले होते त्यातील २५ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवल्यानंतर १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते त्यातील १७ जणांनी आज माघार घेतल्याने ६० जण अंतिम लढतीत आहेत. अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली त्याचाच परिणाम होऊन १७ जणांनी माघार घेतली आहे. तरीही सर्वत्र बहुरंगी लढती होणार आहेत. ४९ रिंगणात रविंद्र साळवे, मोखाडा२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नगर पंचायतिच्या १७ प्रभागांमध्ये होणाऱ््या निवडणुकीतून शुक्रवारी ६० पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४९ उमेदवार रिंगणात असून प्रभाग क्रमांक ९ मधील सेना आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे प्रकरण तिसऱ्या अपत्याबाबत न्याय प्रविष्ट आहे. सेना १५ भाजपा, ११ काँग्रेस ५ ,राष्ट्रवादी ६ असे उमेदवार उभे केले आहेत. तसेस बविआ १ , आरपीआय+ मनसे १ उमेदवार उभे आहेत.ठोकले ५८ जणांनी शड्डू, कॉ.राकॉ, सेना स्वबळावर सुरेश काटे, तलासरीतलासरी नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस पण आज कोणीही माघार न घेतल्याने सर्व ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले . भाजपा व माकपा ने सर्व सतरा वार्डात उमेदवार उभे केले असून ते आपल्या ताकदीवर स्वबळावर निवडणूक लढवित आहेत भाजपा व शिवसेनाची युती पण तलासरीत शिवसेनेची ताकद नसल्याने भाजपने शिवसेनेला जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने शिवसेना स्वबळावर लढत आहे शिवसेनेने सात ठिकाणी उमेदवार उभे केले तलासरीत शिवसेना प्रथमच निवडणूक लढवित आहे व उमेदवार उभे केले हे महत्वाचे. तलासरी नगर पंचायती च्या निवडणूक आता चौरंगी होणार असून आज पासून निवडणूक प्रचाराला खरी सुरु वात होणार आहे .अठ्ठावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणुकीचा धुराळा आता उडणार. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना त्यांची राजकीय ताकद काय आहे हेही कळून येणार आहे.