शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 09:34 IST

२७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

पालघर : वाढवण बंदराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येणार असल्यामुळे त्यांच्या सभेसाठी बनविण्यात आलेला मंडपाचा एक भाग पहाटे आलेल्या वादळी वारा आणि तुफान पावसात उडून रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

केंद्र शासनाच्या बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत वाढवण बंदराचे भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येत असून त्यांच्यासोबतच राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय बंदर मंत्री सदानंद सोनोवाल केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर केंद्रीय मत्स्यपालन पशुसंवर्धन राज्यमंत्री एस पी सिंग बघेल केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.      या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार लोक येणार असल्याचे अपेक्षित असून १००० वाहने येणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासन सर्व व्यवस्था करण्यात युद्ध पातळीवर साशंकता व्यक्त केली जात आहे मात्र मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यांच्या अनेक अडचणी ह्या कामांमध्ये येत असल्याने ३० ऑगस्ट पर्यंत हेच काम पूर्ण होईल का? ह्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

सोमवारी पहाटे पाच वाजता जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असताना मंडपाच्या लोखंडी साहित्याचा भाग उडून सुमारे २०० फूट लांब पालघर- बोईसर रस्त्यावर येऊन पडला. ह्या लोखंडी साहित्यामुळे पालघर बोईसर रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती मात्र तीन तास उलटून गेल्यानंतरही हे साहित्य रस्त्यावरून बाजूला करण्यात आले नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :palgharपालघरNarendra Modiनरेंद्र मोदी