शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भार्इंदर : शहराची सुरक्षा अद्याप वा-यावरच; सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पालिकेचा अहवाल अद्याप सादर नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:19 IST

मीरा-भार्इंदरमधील महत्वांच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राज्य सरकारकडुन शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पोलिस व पालिकेला स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहविभागाकडुन देण्यात आले.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील महत्वांच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राज्य सरकारकडुन शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पोलिस व पालिकेला स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहविभागाकडुन देण्यात आले. यापैकी पोलिसांनी अहवाल सादर केला असुन पालिकेने मात्र अद्याप तसा कोणताही अहवाल सादर केला नसल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. यामुळे शहरावरील सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच लटकलेलाच असुन शहराची सुरक्षितता वा-यावर राहिली आहे. शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी काही खाजगी आस्थापना व शाळांमध्ये मागीलम काही घटनांमुळे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी कॅमेरे बसविले जात आहेत. खाजगी आस्थापनांखेरील उर्वरीत महत्वांच्या व संवेदनशील ठिकाणी अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. ते बसविण्यासाठी पालिकेने २०१२ मधील अंदाजपत्रकात ७० लाखांच्या निधीची तरतुद केली होती. त्यापैकी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील बालाजी नगर येथे माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांच्या प्रयत्नातुन ९ एप्रिल २०१२ रोजी सुमारे ५ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सध्या ते सुरु आहेत किंवा नाही, याचा संबंधित यंत्रणेलाच पत्ता नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान पालिकेने प्रायोगिक तत्वावर शहरातील तीन महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. अल्पावधीतच ते नादुरुस्त झाल्याने सध्या त्या ठिकाणी सीसीटिव्हीचा वॉच राहिलेला नाही. तद्नंतर पोलिसांच्या मागणीनुसार पालिकेने मुंबईच्या धर्तीवर शहरातील वाहतुकीचे नियम मोडणा-यांना ई-चलनच्या माध्यमातून चाप लावण्यासाठी वाहतुक बेटावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले. त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणा-या अद्याप किती वाहनचालकांच्या नावे ई-चलन फाडण्यात आले, ते देखील गुलदस्त्यातच आहे. सध्या हे कॅमेरे नादुरुस्त असल्याचे बोलले जात आहे. यावरुन शहराच्या सुरक्षिततेविषयी अनास्थाच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच शाळांतील वाढत्या दुर्घटना पाहता पालिकेच्या एकुण ३५ पैकी चेना शाळा क्र. १० मध्येच कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत ३४ शाळांत कॅमेरे बसविण्याचा ठराव तत्कालिन महासभेत मंजुर झाल्यानंतर त्याची निविदाही काढण्यात आल्याची माहिती सुत्राकडुन देण्यात आली. तरीदेखील या शाळांची सुरक्षितता अद्याप वा-यावर ठेवण्यात आली आहे. तसेच पालिकेचा घनकचरा प्रकल्प असलेल्या ठिकाणच्या कच-याला सतत लागणारी आग कॅमे-याच्या कक्षेत आणण्याचे सुतोवाच प्रशासनाकडुन करण्यात आले होते. त्यावरही अद्याप कार्यवाही करण्यात आलेली  नाही. शहराला सुमारे १० किमी लांबीचा सागरी किनारा लाभला असुन त्याची सुरक्षाही रामभरोसे असुन शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी तीन महिन्यांपुर्वी राज्य सराकारच्या सुचनेनुसार स्थानिक पोलिसांनी पालिकेकडे कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यासाठी सुमारे ७० लाखांहुन अधिक खर्च गृहित धरण्यात आल्याने पालिकेने त्याच्या तरतुदीसाठी असमर्थता दर्शविली. त्यामुळे निधीत अडकलेल्या कॅमे-यांची समस्या सरकार दरबारी गेल्याने त्यावर गृहविभागाचे सचिव बक्षी यांनी स्थानिक पोलिस व पालिका अधिका-यांची बैठक बोलावली होती. त्यात राज्य सरकारकडुन कॅमेरे बसविण्याचा खर्च अदा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र त्यासाठी पोलिस व पालिकेने स्वतंत्र अहवाल राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पोलिस प्रशासनाने कंपनीला अहवाल केला असुन पालिकेकडुन मात्र अद्याप अहवालच सादर करण्यात आला नसल्याचे पालिका सुत्राकडुन सांगण्यात आले. याबाबत पोलिस उपअधिक्षक नरसिंग भोसले यांनीं सांगितले कि, पोलिस ठाणे निहाय सुमारे ५०० हुन अधिक कॅमे-यांच्या जागा निश्चित करुन त्याचा अहवाल कंपनीला सादर केला आहे. तसेच पालिकेचा अहवाल सादर केल्यानंतर कंपनीकडुन त्याची संयुक्तिक पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच कॅमेरे बसविण्याची कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. तसेच पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे  यांनी सांगितले कि, कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याबाबत आयुक्तांना माहिती दिली जाईल.