शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर : शहराची सुरक्षा अद्याप वा-यावरच; सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पालिकेचा अहवाल अद्याप सादर नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:19 IST

मीरा-भार्इंदरमधील महत्वांच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राज्य सरकारकडुन शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पोलिस व पालिकेला स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहविभागाकडुन देण्यात आले.

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील महत्वांच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राज्य सरकारकडुन शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पोलिस व पालिकेला स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहविभागाकडुन देण्यात आले. यापैकी पोलिसांनी अहवाल सादर केला असुन पालिकेने मात्र अद्याप तसा कोणताही अहवाल सादर केला नसल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. यामुळे शहरावरील सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच लटकलेलाच असुन शहराची सुरक्षितता वा-यावर राहिली आहे. शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असले तरी काही खाजगी आस्थापना व शाळांमध्ये मागीलम काही घटनांमुळे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी कॅमेरे बसविले जात आहेत. खाजगी आस्थापनांखेरील उर्वरीत महत्वांच्या व संवेदनशील ठिकाणी अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. ते बसविण्यासाठी पालिकेने २०१२ मधील अंदाजपत्रकात ७० लाखांच्या निधीची तरतुद केली होती. त्यापैकी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील बालाजी नगर येथे माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांच्या प्रयत्नातुन ९ एप्रिल २०१२ रोजी सुमारे ५ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सध्या ते सुरु आहेत किंवा नाही, याचा संबंधित यंत्रणेलाच पत्ता नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान पालिकेने प्रायोगिक तत्वावर शहरातील तीन महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. अल्पावधीतच ते नादुरुस्त झाल्याने सध्या त्या ठिकाणी सीसीटिव्हीचा वॉच राहिलेला नाही. तद्नंतर पोलिसांच्या मागणीनुसार पालिकेने मुंबईच्या धर्तीवर शहरातील वाहतुकीचे नियम मोडणा-यांना ई-चलनच्या माध्यमातून चाप लावण्यासाठी वाहतुक बेटावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले. त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणा-या अद्याप किती वाहनचालकांच्या नावे ई-चलन फाडण्यात आले, ते देखील गुलदस्त्यातच आहे. सध्या हे कॅमेरे नादुरुस्त असल्याचे बोलले जात आहे. यावरुन शहराच्या सुरक्षिततेविषयी अनास्थाच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच शाळांतील वाढत्या दुर्घटना पाहता पालिकेच्या एकुण ३५ पैकी चेना शाळा क्र. १० मध्येच कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत ३४ शाळांत कॅमेरे बसविण्याचा ठराव तत्कालिन महासभेत मंजुर झाल्यानंतर त्याची निविदाही काढण्यात आल्याची माहिती सुत्राकडुन देण्यात आली. तरीदेखील या शाळांची सुरक्षितता अद्याप वा-यावर ठेवण्यात आली आहे. तसेच पालिकेचा घनकचरा प्रकल्प असलेल्या ठिकाणच्या कच-याला सतत लागणारी आग कॅमे-याच्या कक्षेत आणण्याचे सुतोवाच प्रशासनाकडुन करण्यात आले होते. त्यावरही अद्याप कार्यवाही करण्यात आलेली  नाही. शहराला सुमारे १० किमी लांबीचा सागरी किनारा लाभला असुन त्याची सुरक्षाही रामभरोसे असुन शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी तीन महिन्यांपुर्वी राज्य सराकारच्या सुचनेनुसार स्थानिक पोलिसांनी पालिकेकडे कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यासाठी सुमारे ७० लाखांहुन अधिक खर्च गृहित धरण्यात आल्याने पालिकेने त्याच्या तरतुदीसाठी असमर्थता दर्शविली. त्यामुळे निधीत अडकलेल्या कॅमे-यांची समस्या सरकार दरबारी गेल्याने त्यावर गृहविभागाचे सचिव बक्षी यांनी स्थानिक पोलिस व पालिका अधिका-यांची बैठक बोलावली होती. त्यात राज्य सरकारकडुन कॅमेरे बसविण्याचा खर्च अदा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र त्यासाठी पोलिस व पालिकेने स्वतंत्र अहवाल राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पोलिस प्रशासनाने कंपनीला अहवाल केला असुन पालिकेकडुन मात्र अद्याप अहवालच सादर करण्यात आला नसल्याचे पालिका सुत्राकडुन सांगण्यात आले. याबाबत पोलिस उपअधिक्षक नरसिंग भोसले यांनीं सांगितले कि, पोलिस ठाणे निहाय सुमारे ५०० हुन अधिक कॅमे-यांच्या जागा निश्चित करुन त्याचा अहवाल कंपनीला सादर केला आहे. तसेच पालिकेचा अहवाल सादर केल्यानंतर कंपनीकडुन त्याची संयुक्तिक पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच कॅमेरे बसविण्याची कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. तसेच पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे  यांनी सांगितले कि, कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याबाबत आयुक्तांना माहिती दिली जाईल.