शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाईंदर : उत्तन समुद्रात बुडणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना मच्छीमारांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 14:56 IST

भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रविवारी (15 जुलै) सकाळची ही घटना आहे. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रविवारी (15 जुलै) सकाळची ही घटना आहे. तिन्ही मुलं भाईंदर येथील रहिवासी असून समुद्रातील खडकावर जाऊन सेल्फी काढत होते. पण काही वेळातच भरतीचे पाणी वाढून ते पाण्यात अडकले.  भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील तुळशी इमारतीत राहणारा विशाल मोहन मिंडे ( १९) शिर्डी नगरमध्ये राहणारा सचिन शेखर वाघमारे ( १६) व नवघर मार्गावरील गीता भवनमध्ये राहणारा सुमित लवजी कटपरा ( १८) हे तिघंही बारावीचे विद्यार्थी रविवारची सुट्टी असल्याने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उत्तनच्या वेलंकनी तीर्थ मंदिर जवळील समुद्रात गेले होते.

यावेळी सेल्फी काढायच्या नादात पाणी कधी वाढले हे त्यांना कळलेच नाही. काही वेळातच पाणी वाढून तिघेही जण पाण्यात बुडू लागले . शिवाय लाटादेखील जोरात उसळत होत्या. त्या तिघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा सुरु केला. त्याच वेळी वेलंकनी तीर्थ मंदिरात सकाळी 8.30 वाजताची प्रार्थना सुरु होती. समुद्रात तीन मुलं बुडत असल्याचे समजताच तेथे असलेल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली (बगाजी) यांनी अग्निशमन दल व उत्तन सागरी पोलिसांना घटनेची माहिती दिली . 

खवळलेला समुद्र व तिन्ही मुलं बुडण्याची शक्यता पाहता शर्मिला यांचे पती अजित सह गॉडवीन गौऱ्या , ग्रीसीन गोन्साल्विस , फ्रिडम  लानगी या स्थानिक मच्छीमार तरुणांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि तिन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

दरम्यान पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान व उत्तन पोलीस घटनास्थळी आले. तिन्ही मुलांना अग्निशमन केंद्रात नेऊन पोलिसांनी त्यांची विचारपूस करत त्यांना घरी पाठवले. यापूर्वी वेलंकनी किनारी समुद्रात बुडणाऱ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवल्याच्या घटना घडल्या आहेत . या किनारी पर्यटक येत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका , पोलीस आदी यंत्रणेचे दुर्लक्ष पुन्हा चव्हाट्यावर आले आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhayandarभाइंदर