शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाईंदर : उत्तन समुद्रात बुडणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना मच्छीमारांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 14:56 IST

भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रविवारी (15 जुलै) सकाळची ही घटना आहे. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रविवारी (15 जुलै) सकाळची ही घटना आहे. तिन्ही मुलं भाईंदर येथील रहिवासी असून समुद्रातील खडकावर जाऊन सेल्फी काढत होते. पण काही वेळातच भरतीचे पाणी वाढून ते पाण्यात अडकले.  भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील तुळशी इमारतीत राहणारा विशाल मोहन मिंडे ( १९) शिर्डी नगरमध्ये राहणारा सचिन शेखर वाघमारे ( १६) व नवघर मार्गावरील गीता भवनमध्ये राहणारा सुमित लवजी कटपरा ( १८) हे तिघंही बारावीचे विद्यार्थी रविवारची सुट्टी असल्याने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उत्तनच्या वेलंकनी तीर्थ मंदिर जवळील समुद्रात गेले होते.

यावेळी सेल्फी काढायच्या नादात पाणी कधी वाढले हे त्यांना कळलेच नाही. काही वेळातच पाणी वाढून तिघेही जण पाण्यात बुडू लागले . शिवाय लाटादेखील जोरात उसळत होत्या. त्या तिघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा सुरु केला. त्याच वेळी वेलंकनी तीर्थ मंदिरात सकाळी 8.30 वाजताची प्रार्थना सुरु होती. समुद्रात तीन मुलं बुडत असल्याचे समजताच तेथे असलेल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली (बगाजी) यांनी अग्निशमन दल व उत्तन सागरी पोलिसांना घटनेची माहिती दिली . 

खवळलेला समुद्र व तिन्ही मुलं बुडण्याची शक्यता पाहता शर्मिला यांचे पती अजित सह गॉडवीन गौऱ्या , ग्रीसीन गोन्साल्विस , फ्रिडम  लानगी या स्थानिक मच्छीमार तरुणांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि तिन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

दरम्यान पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान व उत्तन पोलीस घटनास्थळी आले. तिन्ही मुलांना अग्निशमन केंद्रात नेऊन पोलिसांनी त्यांची विचारपूस करत त्यांना घरी पाठवले. यापूर्वी वेलंकनी किनारी समुद्रात बुडणाऱ्यांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवल्याच्या घटना घडल्या आहेत . या किनारी पर्यटक येत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका , पोलीस आदी यंत्रणेचे दुर्लक्ष पुन्हा चव्हाट्यावर आले आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhayandarभाइंदर