शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

खाचरातील भातरोपे कुजली

By admin | Updated: July 23, 2015 04:15 IST

पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये

वसई : पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भाताची रोपे आडवी झाली. महिनाभर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसानही होण्याची भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. पावसाने आता थोडी उसंत घेतली तरच, भातशेतीची पुढील कामे करण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होऊ शकेल. गेल्या २४ तासांत उपप्रदेशात वसई येथे २०० मिमी, मांडवी- १८७ मिमी, विरार- १४९ मिमी, आगाशी- ९५ मिमी, माणिकपूर व निर्मळ प्रत्येकी - १७६ मिमी पाऊस झाला.गेल्या १९ जूनला अशीच मुसळधार वृष्टी झाली होती. त्यानंतर, मात्र पावसाने काढता पाय घेतला होता. यंदाही संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. महिनाभर पाऊस न झाल्यामुळे सुका दुष्काळ निर्माण होतो की काय, अशी भीती वाटत असतानाच गेल्या ३ दिवसातील मुसळधार वृष्टीमुळे शेतकरीवर्गात आता ओला दुष्काळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर : भरपावसात मोटारसायकलवरून पालघरला कामावर जात असताना कडूनिंबाचे झाड अंगावर कोसळून झालेल्या अपघातात प्रकाश माळी (४५), रा. सातपाटी हे जागीच ठार झाले. शिरगाव, आंबेडकरनगरजवळील रस्त्याच्या कडेला झालेल्या अपघाताची सातपाटी पोलिसांनी नोंद केली आहे.सातपाटीच्या शेगटपाड्याजवळ राहणारे प्रकाश माळी आज सकाळी ९ च्या दरम्यान पालघरमधील आनंदाश्रम कॉन्व्हेंट स्कूलच्या पाठीमागे असलेल्या औद्योगिक परिसरातील एका कारखान्यात जात होते. त्यांची मोटारसायकल शिरगावच्या आंबेडकरनगरजवळ आली असताना एका खाजगी बागायतदाराच्या बागेत असलेले कडूनिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली सापडून प्रकाश माळी यांचा मृत्यू झाला. तलासरी : तालुक्यातील मौजे गिरगाव-आरजपाडा येथील एका आदिवासी शेतकऱ्याचा नदीकिनारी कोसळलेल्या दरडीखाली दबल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा हा पहिला बळी ठरला आहे. तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गिरगाव येथून वाहत जाणारी वरोळी नदी व तिला येऊन मिळणारा गावातील ओढा, या ठिकाणी गिरगाव-आरजपाडा येथील आदिवासी शेतकरी नवशा हरजी ठाकरे (५५) शेतीकामासाठी गेले असता नदीकिनाऱ्याची मातीची दरड कोसळल्याने त्या दरडीखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सतत दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी व ओहोळांना पूर आल्याने नदीकिनाऱ्यांलगतची माती वाहून गेल्याने किनाऱ्यांलगतची जमीन भुसभुशित झाल्याने हा अपघात घडला.विक्रमगड : तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात १६५८ हेक्टरवर भातलागवड केली जात असून काही शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी तुंबल्याने भातलावणीचाही खोळंबा झाला आहे. तालुक्यात सरासरी ९३ मिमी पावसाची नोंद झाली असून विहिरी, नाले, नद्या तुडुंब भरले आहेत. पूरपरिस्थिती नसून जनजीवन सुरळीत आहे. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत लावणीची ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला.कासा : डहाणू तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पेठजवळील सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे पेठजवळील सूर्या नदीवरील बंधारा पद्धतीचा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे परिसरातील उर्से, पेठ, म्हसाड, आंबिवली, साये, नानिवली, धामटणे आदी गावांतील संपर्क तुटला होता. त्यामुळे बोईसरकडे जाणाऱ्या नागरिकांना व चाकरमान्यांना १० किमी जास्त अंतर पार करून चारोटीमार्गे जावे लागते. या पुलाची उंचीही कमी आहे तसेच तो अरुंद आहे. त्यामुळे उंची व रुंदी वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.