शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

खाचरातील भातरोपे कुजली

By admin | Updated: July 23, 2015 04:15 IST

पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये

वसई : पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भाताची रोपे आडवी झाली. महिनाभर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसानही होण्याची भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. पावसाने आता थोडी उसंत घेतली तरच, भातशेतीची पुढील कामे करण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होऊ शकेल. गेल्या २४ तासांत उपप्रदेशात वसई येथे २०० मिमी, मांडवी- १८७ मिमी, विरार- १४९ मिमी, आगाशी- ९५ मिमी, माणिकपूर व निर्मळ प्रत्येकी - १७६ मिमी पाऊस झाला.गेल्या १९ जूनला अशीच मुसळधार वृष्टी झाली होती. त्यानंतर, मात्र पावसाने काढता पाय घेतला होता. यंदाही संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. महिनाभर पाऊस न झाल्यामुळे सुका दुष्काळ निर्माण होतो की काय, अशी भीती वाटत असतानाच गेल्या ३ दिवसातील मुसळधार वृष्टीमुळे शेतकरीवर्गात आता ओला दुष्काळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.पालघर : भरपावसात मोटारसायकलवरून पालघरला कामावर जात असताना कडूनिंबाचे झाड अंगावर कोसळून झालेल्या अपघातात प्रकाश माळी (४५), रा. सातपाटी हे जागीच ठार झाले. शिरगाव, आंबेडकरनगरजवळील रस्त्याच्या कडेला झालेल्या अपघाताची सातपाटी पोलिसांनी नोंद केली आहे.सातपाटीच्या शेगटपाड्याजवळ राहणारे प्रकाश माळी आज सकाळी ९ च्या दरम्यान पालघरमधील आनंदाश्रम कॉन्व्हेंट स्कूलच्या पाठीमागे असलेल्या औद्योगिक परिसरातील एका कारखान्यात जात होते. त्यांची मोटारसायकल शिरगावच्या आंबेडकरनगरजवळ आली असताना एका खाजगी बागायतदाराच्या बागेत असलेले कडूनिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली सापडून प्रकाश माळी यांचा मृत्यू झाला. तलासरी : तालुक्यातील मौजे गिरगाव-आरजपाडा येथील एका आदिवासी शेतकऱ्याचा नदीकिनारी कोसळलेल्या दरडीखाली दबल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा हा पहिला बळी ठरला आहे. तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गिरगाव येथून वाहत जाणारी वरोळी नदी व तिला येऊन मिळणारा गावातील ओढा, या ठिकाणी गिरगाव-आरजपाडा येथील आदिवासी शेतकरी नवशा हरजी ठाकरे (५५) शेतीकामासाठी गेले असता नदीकिनाऱ्याची मातीची दरड कोसळल्याने त्या दरडीखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सतत दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी व ओहोळांना पूर आल्याने नदीकिनाऱ्यांलगतची माती वाहून गेल्याने किनाऱ्यांलगतची जमीन भुसभुशित झाल्याने हा अपघात घडला.विक्रमगड : तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात १६५८ हेक्टरवर भातलागवड केली जात असून काही शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी तुंबल्याने भातलावणीचाही खोळंबा झाला आहे. तालुक्यात सरासरी ९३ मिमी पावसाची नोंद झाली असून विहिरी, नाले, नद्या तुडुंब भरले आहेत. पूरपरिस्थिती नसून जनजीवन सुरळीत आहे. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत लावणीची ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला.कासा : डहाणू तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पेठजवळील सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे पेठजवळील सूर्या नदीवरील बंधारा पद्धतीचा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे परिसरातील उर्से, पेठ, म्हसाड, आंबिवली, साये, नानिवली, धामटणे आदी गावांतील संपर्क तुटला होता. त्यामुळे बोईसरकडे जाणाऱ्या नागरिकांना व चाकरमान्यांना १० किमी जास्त अंतर पार करून चारोटीमार्गे जावे लागते. या पुलाची उंचीही कमी आहे तसेच तो अरुंद आहे. त्यामुळे उंची व रुंदी वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.